Homeएनसर्कलअंमली पदार्थांच्या तस्करीसाठी...

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी नायजेरियन नागरिकाला अटक

देशात अंमली पदार्थ तस्करीचा छडा लावण्याच्या प्रयत्नांत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी ग्रेटर नोएडा येथून कार्यरत अंमली पदार्थ तस्करी टोळीचा प्रमुख सदस्य असलेल्या नायजेरियन नागरिकाला नुकतीच अटक केली.

अंमली

डीआरआयने यापूर्वी 14.10.2023 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून 2.485 किलो कोकेन जप्त केले होते आणि या टोळीसाठी भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी अधिक सखोल तपासादरम्यान, तस्करी करणाऱ्या या टोळीच्या प्रमुख सदस्याची माहिती मिळाली, जो ग्रेटर नोएडामधून या टोळीला वित्तपुरवठा करून टीम चालवत होता. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि पाळत ठेवल्यानंतर अधिकाऱ्यांना आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले.

त्यानंतर मुंबई आणि नोएडा येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या डीआरआयच्या पथकाने सापळा रचून तस्करी करणाऱ्या या टोळीच्या प्रमुख सदस्याला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोठ्या संख्येने सिमकार्ड, मोबाईल फोन आणि विविध देशातून जारी केलेले अनेक पासपोर्ट सापडले. त्यानंतर, त्याला अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

smuggler

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content