Homeपब्लिक फिगरडॉ. उज्ज्वला जाधव...

डॉ. उज्ज्वला जाधव यांचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई विद्यापीठात बायोलॉजीच्या विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर उज्ज्वला जाधव यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथील राजीव गांधी काँग्रेस भवन येथे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

खासदार वर्षा गायकवाड यांनी डॉ. जाधव यांना पक्षात प्रवेश देताना त्यांच्या हाती काँग्रेसचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार खासदार गायकवाड आणि डॉ. जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला.

डॉ. उज्ज्वला जाधव २०१४पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

डॉ. उज्ज्वला जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असताना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पारचा नारा दिला जात होता. मी डॉ. आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content