Homeबॅक पेजजुन्या अणुऊर्जा प्रकल्पांवर...

जुन्या अणुऊर्जा प्रकल्पांवर भारत आणि फ्रान्समध्ये चर्चा

जुन्या होत चाललेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकाळ परिचालन करण्यापासून ते लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांसह नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानांचे नियमन अशा सर्व विषयांवर चर्चा करण्याकरीता अणुऊर्जा प्राधिकरण मंडळाने (एईआरबी) कालपासून उद्यापर्यंत म्हणजेच 5 ते 7 मार्च, या कालावधीत मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात फ्रान्सच्या एएसएन अर्थात अणुऊर्जा सुरक्षा प्राधिकरणाच्या शिष्टमंडळासाठी तीन दिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे.

एएसएनचे प्रमुख बर्नार्ड डोरोस्झसीझुक यांच्या अध्यक्षतेखालील या फ्रेंच शिष्टमंडळामध्ये एएसएनचे दोन आयुक्त आणि चार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही बैठक म्हणजे एईआरबी आणि एएसएन यांच्यातील द्विपक्षीय बंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. दोन नियामक संस्थांमधील संबंध अधिक मजबूत करण्याप्रती तसेच अणुऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा नियमांच्या बाबतीत सहयोगी संबंध वाढवण्याप्रती असलेल्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे, असे एईआरबीचे अध्यक्ष दिनेश कुमार म्हणाले.

जुन्या होत चाललेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकाळ परिचालन करण्यापासून ते लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांसह नव्या आणि प्रगत तंत्रज्ञानांचे नियमन अशा सर्व विषयांतील माहितीचे सामायीकीकरण करण्यासाठी तांत्रिक सहकार्याची क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. या बैठकीत एईआरबीच्या नियामक उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी एईआरबीतर्फे नियामक संशोधनावर आधारित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय द्विपक्षीय बैठकीच्या कालावधीत एएसएनच्या शिष्टमंडळाच्या तारापूर अणुऊर्जा केंद्र भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. एईआरबीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यविषयक उपक्रमांचा भाग म्हणून जुलै 1999पासून ही संस्था एएसएनशी जोडली गेली आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content