Homeपब्लिक फिगर‘मी पुन्हा येईन..'च्या...

‘मी पुन्हा येईन..’च्या स्वप्नाला अजून २५ वर्षं?

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्षं लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आम्ही फासे फिरवणार आहोत असे भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही. गेली २२ वर्षं माजी मुख्यमंत्री नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. पण, फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवतानाच सांगितले आहे की, हे सरकार पाचच नाही तर २५ वर्षं टिकणार आहे आणि तेच घडणार असेही ते म्हणाले.

लोकांना मूर्ख बनवण्याचे मोदींचे काम

मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते कळत नसेल किंवा कळूनही लोकांना मूर्ख बनवण्याचे काम ते करत असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.

मोदींना आजपर्यंत कळलंच नाही की शरद पवार या देशातील कृषी सुधाराचे पक्षकार होते.  तेव्हाही आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते. ते कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची त्यांची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले, ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्र सरकारने मॉडेल कायदा केला नाही. राज्य सरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजचा कायदा आणि मॉडेल कायदा काय आहे यातील फरक मोदींनी समजून घ्यावा. अजून वेळ गेलेली नाही. सुधारणांच्या विरोधात राष्ट्रवादी किंवा कुठलाही पक्ष नाही. पण एकमत निर्माण करणे, लोकांना विश्वासात घेणे व सध्याचे कायदे आहेत त्यात बदल करणे गरजेचे असताना अजून रेटण्याची भूमिका पंतप्रधान घेत असतील किंवा सरकार करत असेल तर ते योग्य नाही, असेही मलिक म्हणाले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content