Tuesday, September 17, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजदादरच्या फेरीवाल्यांमध्ये आता...

दादरच्या फेरीवाल्यांमध्ये आता ‘आपलेतुपले’ सुरू!

मुंबईच्या दादर (प.) परिसरातील फेरीवाल्यांची गर्दी पाहतच मी मोठा झालो आणि आता म्हाताराही! येथील गर्दी काही हटत नाही. उलट ती दिवसागणिक वाढतच जात आहे. तशातही काही पोलीस व महापालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असतात हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. पण या कौतुकातही ‘आपले तुपले’ असल्याने केवळ नाईलाजाने आज हे लिहावे लागत आहे. सणवार मग तो हिंदूंचा असो की मुसलमानांचा की ख्रिस्ती बांधवांचा.. दादरला नेहमीच जत्रेचे स्वरूप येते हे काही नव्याने सांगायला नको. सध्या या संबंधात खटलाही उच्च न्यायालयासमोर आहे. यात सर्वच यंत्रणा मुंबई शहर फेरीवालामुक्त असावे असे एकमुखाने सांगत असल्या तरी प्रत्यक्षात जमिनी हकीकत वेगळीच आहे हे मुंबईकर जाणून आहेत.

दादरच नव्हे तर शहरातील तसेच दोन्ही उपनगरातील अनेक रेल्वेस्थानकांचे परिसर म्हणजे मोठे मार्केट परिसरच झालेले आहेत. दादर येथे जवळजवळ सर्वच बाजार असल्याने पश्चिमेला जरा प्रचंडच गर्दी असते हे मान्यच करावे लागेल. सर्वच सरकारी यंत्रणा आपापल्या मते फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत असतात हेही मान्य केले पाहिजे. परंतु त्यामानाने फेरीवाल्यांचा उपद्रव काहीसा कमी असलेला विभाग म्हणजे पोर्तुगीज चर्चचा परिसर. येथे काही खाऊगल्ल्या रात्रीच कार्यरत असतात. त्यांचा तसा कुणालाही त्रास नसतो, आता खाताना काही खवय्ये मोठ्याने बोलत असतील तेव्हडेच!

या आवाजाव्यतिरिक्त मोटारचे हॉर्न, बसेसचे कर्णकर्कक्ष ब्रेकचे आवाज, मधूनच एखाद्या रुग्णवाहिकेचा सायरन आदी अनेक आवाज पोर्तुगीज चर्च परिसरात होतच असतात. त्यात नवीन काहीच नाही. पण याच परिसरात म्हणजे उदय टेलर असलेली इमारत व जवळच असलेल्या कृष्णकुंज इमारतीतील एका माजी क्रिकेटपटूच्या दूरच्या नातेवाईकाला आवाजाचा वा फेरी धंद्याचा त्रास होतो म्हणून क्रिकेटपटूच्या नावाचा संदर्भ देत शिवाजीपार्क पोलीसठाण्यात तक्रार झाली तर त्या बिचाऱ्या टपरीवर कारवाई होणारच! बरे

त्यांनी गाडी न लावता खाण्याच्या ऑर्डरी पुऱ्या करायचे ठरवले तर कोपऱ्यावर ठेवलेल्या वस्तूंचा फोटो काढून पोलीसठाण्याला पाठवणारे महाभागही आहेतच! जसं काही त्या परिसरात दुसरं काही चालतच नाही. याच इमारतीपासून दहा-पंधरा पावलावर एक-दोन मोठे ठेलेही आहेत. त्यांचा त्रास मात्र होत नाही, हे न पटणारे तर्कशास्त्र आहे. येथूनच अजून दहा पावले दूर कुणी ठेलेवाल्याने पूर्वीचा टेलिफोन बूथ सोडून मोठा आईस्क्रीम स्टॉल टाकलेला यंत्रणेला कसा चालतो? तोही आपला मूळ आकार सोडून सर्व पदपथ आपल्यात सामावून घेणारा? प्रत्येक वेळी गरीब फेरीवाला दंडाचे 1200 रुपये कुठून आणणार?

महिला नेत्याने बिर्याणी रस्त्यात ओतली!

याच दादर परिसरात बंगाली मुस्लिम फेरीवाले वाढल्याची तक्रार एका राष्ट्रीय पक्षाच्या स्थानिक महिला नेत्यानी केली होती. वास्तविक बेकायदा बंगाली घुसखोरांना शोधण्याचे काम मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे असताना व गृह मंत्री त्यांच्याच पक्षाचे असताना त्यांनी जाहीर भाषणात आरोप का करावा हा येथील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. या महिला नेत्याने अगदी काही दिवसांपूर्वी याच परिसरात असलेल्या महानगर टेलिफोन कार्यालयाबाहेरील पदपथावर एका मुस्लिम फेरीवाल्याचा बिर्याणी भरलेला टोप रस्त्यावर उपडा करून सर्व बिर्याणी रस्त्याला खाऊ घातल्याचा किळसावाणा प्रकार केल्याचेही अनेकांनी या प्रतिनिधीला सांगितले. या देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री ‘सर्वधर्म समभाव’चा राग आळवत असताना या रागात हा बेसूर कशाला, असा सूरही काहींनी लावला.

आम्ही गर्दी करून जनतेला सतवणाऱ्या फेरीवाल्यांची बाजू घेत नाही तर काही ठराविक समुदायावर डुख ठेवून जी कारवाई होत आहे त्याचा निषेधच करू. दादर साफच करायचे असेल तर ते सर्व दादर साफ करा. एक कोपरा साफ करण्याचे नाटक नको, अशी जनतेची भावना आहे. शिवाय आता सणावाराचे दिवस असताना गरिबांवर कारवाई करताना सांभाळून कारवाई करा, असा खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सल्ला असताना गरिबांनाच हिसका दाखवण्याचा ‘तेजस्वी’ बाणा नको..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुख्यमंत्री एकनाथरावांच्या ‘आनंदावतारा’चा खासदार म्हस्केंनाही ‘प्रसाद’?

गुरुवारी गौरीविसर्जनाच्या दिवशी संध्याकाळ व रात्रीच्या सुमारास धर्मवीर आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या गजरात केलेल्या नोटांच्या उधळणीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी नव्हे इतके संतप्त झाले असून त्यांनी आनंदाश्रमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय...

अहो गिरगावकर, करा तरी बदल एकदाचा!

गणपतीच्या दिवसात गिरगावात जाणे होतेच! कारण सर्व आयुष्य गिरगांवात गेले. अख्खं तारुण्य गिरगावात गेलं. मध्यमवयीन होईतोर्यन्त गिरगावशी नातं घट्ट होतं. त्यानंतर दोन्ही उनगरात संक्रमण केलं. परंतु गणपतीत गिरगावची वारी कधी चुकवली नाही. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून गिरगावात जाणं बरंच जिकरीचं...

आरे कॉलनीतील फिल्टरपाडा ‘फिल्टर’ तरी होणार कधी?

मुंबईतल्या आरे कॉलनीच्या टोकाला (पवईच्या बाजूने) फिल्टरपाडा सर्कल परिसरात नेहमीच रिक्षा व खासगी मोटारगाड्या पार्क केल्या जात असतात. गेली अनेक वर्षे येथे वाहतुकीला अडथळा न करता गाड्यांचे पार्किंग केले जाते. कारण उघड आहे, फिल्टरपाड्यात चाळीत राहणाऱ्या गरिबांकडे घरासमोर गाडी पार्क...
error: Content is protected !!
Skip to content