Homeकल्चर +जयपूर महोत्सवात मिळाला...

जयपूर महोत्सवात मिळाला ‘दाल रोटी’ला पुरस्कार

१६व्या जयपूऱ चित्रपट महोत्सवात ‘दाल रोटी’ चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चित्रपटाच्या दिग्दर्शिका ज्युली जास्मिन यांनी राजस्थानचे माजी मुख्य सचिव निरंजन आर्य, बी. एस. रावत, होनू रोज आदी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरपासून देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची इफ्फी २०२४च्या महोत्सवासाठीदेखील निवड झाली आहे. प्रसिद्ध निर्माते सलीम या चित्रपटाचे निर्माते असून ज्युली जास्मिन दिग्दर्शिका आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करून त्यांची सोडवणूक करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट देशातील शेतकरी आणि जनतेसाठी शेती तसेच देशभक्तीचा संदेश देणारा आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content