Tuesday, February 4, 2025
Homeकल्चर +जयपूर महोत्सवात मिळाला...

जयपूर महोत्सवात मिळाला ‘दाल रोटी’ला पुरस्कार

१६व्या जयपूऱ चित्रपट महोत्सवात ‘दाल रोटी’ चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चित्रपटाच्या दिग्दर्शिका ज्युली जास्मिन यांनी राजस्थानचे माजी मुख्य सचिव निरंजन आर्य, बी. एस. रावत, होनू रोज आदी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरपासून देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची इफ्फी २०२४च्या महोत्सवासाठीदेखील निवड झाली आहे. प्रसिद्ध निर्माते सलीम या चित्रपटाचे निर्माते असून ज्युली जास्मिन दिग्दर्शिका आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करून त्यांची सोडवणूक करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट देशातील शेतकरी आणि जनतेसाठी शेती तसेच देशभक्तीचा संदेश देणारा आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content