Homeचिट चॅटसुभाष देसाई लॉ...

सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

मुंबईतल्या सुभाष देसाई लॉ कॉलेजमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायिक अधिकारी पवन तापडिया आणि उत्तर विभाग गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संविधान दिनानिमित्त कॉलेजतर्फे जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक आहेर, एपीआय सविता कदम आणि सुभाष देसाई लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या आरती साळुंखे उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना सचिव पवन तापडिया यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व व आधुनिक काळातील त्याची प्रासंगिकता यावर प्रकाश टाकला. त्यांनी संवैधानिक नैतिकता, कायद्याचे राज्य आणि लोकशाहीचे संरक्षण यावर भर देत, तरुण विधि विद्यार्थ्यांना त्यांच्या कायदे शिक्षणाद्वारे संवैधानिक मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक आहेर यांनी सायबर गुन्हे जनजागृतीवर मार्गदर्शन केले. त्यांनी ऑनलाइन धोके, डिजिटल सुरक्षितता, विविध प्रकारचे सायबर गुन्हे आणि त्यासंबंधित कायदेशीर तरतुदी याबद्दल सविस्तर माहिती दिली. एपीआय कदम यांनी प्रत्यक्ष घडलेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे, तपास प्रक्रिया, तक्रार नोंदविण्याची पद्धत आणि प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ज्यामुळे सायबर सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली.

या कार्यक्रमात अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रभारी प्राचार्या साळुंखे यांनी सर्व मान्यवरांचे तसेच विधि सेवा प्राधिकरणाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content