Homeहेल्थ इज वेल्थमानसिक आरोग्याचं महत्त्व...

मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगणारी परिषद उद्यापासून पुण्यात!

मानसिक आरोग्याचं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असलेले महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा समतोल राखणे किती आवश्यक आहे हे कोरोना महामारीच्या काळात अधोरेखित झालं आहे. या संपूर्ण विषयावर अधिक जनजागृती करण्याच्या उद्देशानं ए. पी. जे. ग्लोबलने पुण्यात उद्यापासून ‘स्वास्थ्यम्’, या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे.

 मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याच्या हेतूनं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. गणेश कला क्रीडा केंद्र, पुण्याचे जे. डब्ल्यू. मॅरिएट आणि डीपी रस्त्यावरील पंडित फार्मस् अशा तीन ठिकाणी ही तीन दिवसांची परिषद होत आहे. योग, फिटनेस, मानसिक आरोग्य जपणुकीसाठी संगीताचे महत्त्व अशा विविध विषयांवर या परिषदेत मार्गदर्शन केलं जाणार आहे. ९ ते ११ डिसेंबर, २०२२ या काळात ही परिषद होणार आहे.

‘स्वास्थ्यम्’च्या व्यासपीठावर आरोग्य आणि स्वास्थ्य या क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांकडून त्यांच्या सत्रांना उपस्थित राहणाऱ्यांना परस्पर संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे.

डॉ. कुमार विश्वास, डॉ. हंसराज योगेंद्र, सर्वेश शसी, डॉ. राजेंद्र बर्वे, योगी श्री एम, ‘इस्कॉन’चे गौरांग दास, प्रख्यात अभिनेत्री आणि हेल्थ आयकॉन शिल्पा शेट्टी, उस्ताद रशिद खाँ आणि रुहानी सिस्टर्स हे संगीत क्षेत्रातले मान्यवर, मार्शल आर्टमधले तज्ज्ञ चिता यज्नेश शेट्टी, आवाजाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्या प्रियांका पटेल, आहारतज्ज्ञ नुपूर पाटील स्वास्थ्यम् परिषदेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनिलिआ देशमुख हेदेखील परिषदेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहून या आगळ्या उपक्रमाला आपला पाठिंबा देणार आहेत.

मानसिक आणि शारिरिक आरोग्याचे महत्त्व आणि त्यांचा परस्पर संबंध याबाबत जागृती व्हावी यासाठी हा जागतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात तरुणाई आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात भरीव कार्य करणारेही या शहरात वास्तव्यास आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत विविध वयोगटांशी चर्चा करुन जागृती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः देशाचे भविष्य असलेल्या तरुण वर्गात याबाबत जागृती होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर व्हावा, हा ही परिषद आयोजित करण्यामागचा हेतू आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content