Homeचिट चॅटमंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळ स्पर्धेसाठी १०६ खेळाडूंत चुरस

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उद्यापासून आयोजित करण्यात आलेल्या मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धीबळपटूंसह १०६ खेळाडूंमध्ये चुरस असेल.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई आणि युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यावतीने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ३० रोख व ७५ चषक पुरस्कार दिले जाणार आहेत. २० व २१ जुलै दरम्यान ही स्पर्धा आरएमएमएस वातानुकूलित हॉल, परेल, मुंबई-१२ येथे रंगणार आहे.

आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्या सहकार्याने शालेय मुलामुलींची ८/१०/१२ वर्षांखालील वयोगटाची बुद्धीबळ स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा खुली जलद तसेच स्विस लीग पद्धतीने होणार आहे. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुद्धीबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे. बुद्धीबळपटूंच्या आग्रहास्तव स्पर्धा प्रवेशअर्जाची मुदत आज, १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे संपर्क साधावा.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content