Homeचिट चॅटमंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळ स्पर्धेसाठी १०६ खेळाडूंत चुरस

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उद्यापासून आयोजित करण्यात आलेल्या मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धीबळपटूंसह १०६ खेळाडूंमध्ये चुरस असेल.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई आणि युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यावतीने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ३० रोख व ७५ चषक पुरस्कार दिले जाणार आहेत. २० व २१ जुलै दरम्यान ही स्पर्धा आरएमएमएस वातानुकूलित हॉल, परेल, मुंबई-१२ येथे रंगणार आहे.

आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्या सहकार्याने शालेय मुलामुलींची ८/१०/१२ वर्षांखालील वयोगटाची बुद्धीबळ स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा खुली जलद तसेच स्विस लीग पद्धतीने होणार आहे. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुद्धीबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे. बुद्धीबळपटूंच्या आग्रहास्तव स्पर्धा प्रवेशअर्जाची मुदत आज, १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे संपर्क साधावा.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content