Homeचिट चॅटमंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळ स्पर्धेसाठी १०६ खेळाडूंत चुरस

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उद्यापासून आयोजित करण्यात आलेल्या मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धीबळपटूंसह १०६ खेळाडूंमध्ये चुरस असेल.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई आणि युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यावतीने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ३० रोख व ७५ चषक पुरस्कार दिले जाणार आहेत. २० व २१ जुलै दरम्यान ही स्पर्धा आरएमएमएस वातानुकूलित हॉल, परेल, मुंबई-१२ येथे रंगणार आहे.

आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्या सहकार्याने शालेय मुलामुलींची ८/१०/१२ वर्षांखालील वयोगटाची बुद्धीबळ स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा खुली जलद तसेच स्विस लीग पद्धतीने होणार आहे. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुद्धीबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे. बुद्धीबळपटूंच्या आग्रहास्तव स्पर्धा प्रवेशअर्जाची मुदत आज, १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे संपर्क साधावा.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content