7 ते 15 वर्षांची मुले करू शकतील मोफत आधार अपडेट

जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य असलेल्या बायोमेट्रिक अपडेटचे सर्व शुल्क माफ केले आहे. या निर्णयामुळे जवळजवळ 6 कोटी मुलांना त्यांचे आधार कार्डाचे विनामूल्य बायोमेट्रिक अपडेट करता येतील. 1 ऑक्टोबर 2025पासून शुल्कमाफीचे हे नियम लागू झाले असून ते पुढील एक वर्षासाठी अंमलात राहतील.

पाच वर्षांखालील मुलांचा आधार नोंदणी करताना फक्त छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्मप्रमाणपत्र घेतले जाते. या वयात मुलांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे (आयरिस) बायोमेट्रिक परिपक्व नसल्याने त्यांची नोंद घेतली जात नाही. सध्याच्या नियमांनुसार, मुलगा किंवा मुलगी पाच वर्षांचा झाल्यावर त्याचे किंवा तिचे बोटांचे ठसे, आयरिस आणि छायाचित्र अद्ययावत करणे बंधनकारक असते. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट असे म्हटले जाते. तसेच मुलगा किंवा मुलगी 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असते, ज्याला दुसरे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट म्हटले जाते. पहिला आणि दुसरा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट अनुक्रमे 5 ते 7 आणि 15 ते 17 वर्षे वयोगटात केल्यास त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यानंतर प्रत्येक अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटसाठी 125 रुपये शुल्क आकारले जाते. या नव्या निर्णयामुळे आता 5 ते 17 वयोगटातील सर्व मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट वर्षासाठी मोफत झाले आहे.

अद्ययावत बायोमेट्रिक असलेल्या आधारमुळे मुलांचे दैनंदिन जीवन सुलभ होते. शाळेत प्रवेश, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी, शिष्यवृत्ती आणि थेट बँक खात्यात पैसे जमा (थेट लाभ हस्तांतरण), योजनांचा लाभ घेणे यांसारख्या सेवांचा अखंडित वापर करता येतो. आईवडील किंवा पालकांनी आपल्या मुलांचे किंवा पाल्यांचे आधार बायोमेट्रिक तातडीने अद्ययावत करावेत, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

Continue reading

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...

रतन टाटांची जयंती उत्साहात साजरी

रतन टाटांची जयंती केवळ स्मरणदिन न राहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार के. रवि (दादा) यांनी केली. देशाच्या औद्योगिक व सामाजिक प्रगतीत रतन टाटा यांचे अतुलनीय योगदान पाहता यंदा 28...

कतरिना आणि हृतिकचं परस्परविरोधी जग आलं सोबत!

आपल्या नवीन अभियानासाठी राडोने कतरिना कैफ आणि हृतिक रोशन या आपल्या दोन प्रसिद्ध जागतिक अम्बॅसडर्सना एका दृश्यात्मक क्रिएशनमध्ये एकत्र आणले आहे, ज्यात प्रत्येक बाबतीत परस्परविरोधी असलेली दोन जगं एकमेकांकडे आकृष्ट होतात व शेवटी एकत्र होतात. या दोन्ही कलाकारांशी केलेल्या...
Skip to content