Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना राज्य...

चेंबूर जिमखाना राज्य कॅरम स्पर्धा शनिवारपासून 

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शनिवारी, २० जुलैला सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होत आहे तर महिला गटांच्या सामन्यांना २१ जुलैला प्रारंभ होईल.

पुरुष एकेरी गटात ३२० तर महिला एकेरी गटात ५० खेळाडूंनी भाग घेतला असून पुरुष एकेरी गटातील विजेत्याला रोख रुपये २५ हजार तर महिला एकेरी गटातील विजेतीला रोख रुपये ८ हजारांचे बक्षिस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या सामन्यांचे तसेच उपउपांत्य फेरीपासूनच्या सामन्यांचे थेट प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे. चालू वर्षी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आपले ७०वे वर्ष साजरे करत असून यंदाच्या मोसमातील ही चौथी स्पर्धा आहे.

पुरुष एकेरी गटात ५८ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या मोहम्मद घुफ्रानला प्रथम मानांकन देण्यात आले आहे, तर ४३ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या विकास धारियाने द्वितीय मानांकन प्राप्त केले आहे. महिलांमध्ये ७१ गुणांनिशी आघाडीवर असणाऱ्या मुंबईच्या काजल कुमारीला अग्र मानांकन देण्यात आले असून ५८ गुण प्राप्त करणाऱ्या ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने द्वितीय मानांकनाचा मान मिळविला आहे.

स्पर्धेतील मानांकन असे..

पुरुष एकेरी: १) महम्मद घुफ्रान (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) अभिजित त्रिपणकर (पुणे), ४) प्रशांत मोरे (मुंबई), ५) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ६) झैद फारुकी (ठाणे), ७) रहिम खान (पुणे), ८) पंकज पवार (मुंबई).

महिला एकेरी: १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) अंबिका हरिथ (मुंबई), ५) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ६) श्रुती सोनावणे (पालघर), ७) उर्मिला शेंडगे (मुंबई), ८) आएशा खान (मुंबई)

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content