Homeब्लॅक अँड व्हाईटकेंद्र सरकार ‘भारत...

केंद्र सरकार ‘भारत आटा’ प्रति किलो ₹ 27.50 दराला करणार उपलब्ध!

गहू आणि गव्हाची कणीक किफायतशीर दराला उपलब्ध व्हावी, याकरता केंद्रीय भांडार, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ), अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना, आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएएफईडी), अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना (नाफेड), यासारख्या निमशासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजारात विक्री योजने [OMSS(D)] अंतर्गत, गहू खरेदी करून, त्याची कणीक, प्रति किलो रु. 27.50 इतक्या कमाल किरकोळ दरापर्यंत ‘भारत आटा’ ब्रँड अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता, 2.5 लाख मेट्रिक टन गहू, प्रति किलो रु.21.50 दराने वितरित करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रीय भांडार, नाफेड, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांच्या सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष अथवा फिरत्या विक्री केंद्रांवर किफायतशीर दराने गव्हाची कणीक उपलब्ध व्हावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

या संस्थांद्वारे भारत आटा ₹ 27.50/Kg पेक्षा जास्त नसलेल्या किमान किरकोळ दराला विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल, जो कणकेच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमतींपेक्षा कमी आहे. केंद्र सरकारच्या गोदामात 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत 209.85 लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा साठा होता.

भारत सरकार केंद्रीय/राज्य सहकारी संस्थांच्या देशभरातली प्रत्यक्ष/फिरत्या किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून, प्रक्रिया करण्याकरता आणि कणीक बनवून विक्री करण्याकरता गहू उपलब्ध करणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी भाई चव्हाण यांची निवड

राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. १५ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा हा एकूण १४ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. या...

महाराष्ट्रातल्या 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके घोषित

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसेच सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातल्या एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 31 पोलीस कर्मचाऱ्यांना 'वीरता पदक', उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेकरीता दिली जाणारी राष्ट्रपती पदके, पोलीस दलातल्या 4 अधिकाऱ्यांना आणि सुधारात्मक सेवा विभागातल्या 2 कर्मचाऱ्यांचा...

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी होती अशी फुलांची सजावट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल झालेल्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृती स्थळावर विविध फुलझाडांनी तसेच शोभिवंत झाडांनी सजावट केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मांडणी करण्यात आली. यामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाच्या...
Skip to content