Homeब्लॅक अँड व्हाईटबांधकाम व पाडकाम...

बांधकाम व पाडकाम कचऱ्याबाबत केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे

बांधकाम आणि पाडकाम  कचरा हा जगातील सर्वात मोठा घनकचऱ्यांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार भारतातील बांधकाम उद्योग दरवर्षी सुमारे 150-500 दशलक्ष टन बांधकाम आणि पाडकाम कचरा निर्माण करतो. यामुळे त्या कचऱ्याचे डंपिंग करणे तसेच विल्हेवाट लावण्यासाठी जागेचा अभाव हा प्रश्‍न आहेच आणि यामध्‍ये जैवविघटनशील कचऱ्याचे प्रमाण वाढविण्‍यासाठी कराव्या लागणाऱ्या मिश्रणाची अयोग्य पद्धत यासारखी अनेक आव्हाने समोर येतात. हा कचरा कमी करण्यासाठी आणि कचरा सामग्रीचा पुनर्वापर करण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानाला मोठी मागणी आहे. यादृष्टीने आता, आम्ही बांधकाम आणि पाडकाम कचरा, प्लास्टिक कचरा, ई-कचरा आणि जैव-धोकादायक कचरा यांच्यासह कचरा व्यवस्थापनाच्या इतर प्रकारांमध्ये विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.

“बांधकाम क्षेत्रात बांधकाम आणि पाडकाम  कचऱ्याचा पुनर्वापर आणि वापराविषयी अलिकड काळात घडलेला विकास” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पुरी बोलत होते. शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना हरदीप पुरी यांनी नमूद केले की, 2015मध्ये सुरू करण्यात आलेली शहरी मोहीम ही याची चांगली उदाहरणे आहेत. पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सेवा वितरणाच्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याच्या सरकारच्या हरित दृष्टीकोनातून घनकचरा प्रक्रियेत 2014मध्ये केवळ 17% होती त्यामध्‍ये वाढ होऊन हे प्रमाण  2024 मध्ये 77%पेक्षा जास्त झाले आहे.

बांधकाम उद्योग हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. त्याचबरोबर  देशात रोजगार देणारा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. अर्थव्यवस्थेमध्‍ये 250 क्षेत्रांमध्ये ‘फॉरवर्ड’ आणि ‘बॅकवर्ड’ लिंकेज बांधकाम क्षेत्राला आहे. म्हणजे प्रत्यक्ष बांधकामाआधी अनेक कामे करावी लागतात तसेच विविध कामे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर करावी लागतात. 2025पर्यंत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची बांधकाम बाजारपेठ असेल, असा अंदाज आहे, असे ते म्हणाले.

भारताला 2030 पर्यंत दरवर्षी सुमारे 700-900 दशलक्ष चौरस मीटर व्यावसायिक आणि निवासी जागांची आवश्यकता असणार आहे. जर भारत 2047 पर्यंत विकसित देश बनवायचा असेल, तर त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा घटक महत्त्वाचा असणार आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत पर्यावरणाचा विचार करताना विशेषत: सी अॅंड डी म्हणजेच  बांधकाम आणि पाडकाम यांच्या कचऱ्याची विल्हेवाट, ही गोष्‍ट महत्त्वाची आहे. त्यामुळे वाढत्या बांधकाम क्रियाकलापांसह, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक कार्यक्षम उपाय शोधणे अत्यावश्यक आहे, असेही पुरी यांनी सांगितले.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने  बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापनाबाबत सर्व भागधारकांची मानसिकता बदलण्यासाठी केलेल्या प्रगतीवर बोलताना पुरी म्हणाले की, गृहनिर्माण मंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येक प्रमुख शहर/नगरासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा निर्मितीचा डेटा-माहिती जमा करण्याची सूचना केली आहे.   बांधकाम आणि पाडकाम कचरा, स्त्रोतांच्या ठिकाणीच विलग करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे आणि हा कचरा संकलनासाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापन करण्‍यात यावी.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content