Homeटॉप स्टोरीनारायण राणेंची खासदारकी...

नारायण राणेंची खासदारकी रद्द करा!

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्षे निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी घालावी, अशा आशयाची कायदेशीर नोटीस शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला पाठवली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत त्यांनी ही नोटीस पाठवल्याचे समजते.

निवडणूक प्रचाराचा कालावधी ०५/०५/२०२४ रोजी संपलेला असतानाही भाजपा कार्यकर्ते ०६/०५/२०२४ रोजीसुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. नारायण राणेसमर्थक प्रचार संपलेला असतानाही ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणेंनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, जर राणेंना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचे आहे. लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही. १३ एप्रिलला रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी ही धमकी दिल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

राणे

निवडणूक आचारसंहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसामार्फत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसात या नोटीसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपाच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आले हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content