Homeपब्लिक फिगरमौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

मौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

नागपूरच्या मौदा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन  झाल्यामुळे रामटेक आणि मौदा हे तालुके उमेरड आणि कुही तालुक्यांना जोडले जातील तसेच या पुलामुळे नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना कनेक्टेव्हिटी मिळून येथील व्यवसायालादेखील चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मौदा येथे केले.  

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपूलांच बांधकाम, गोवरी कोरगाव राजोला मौदा येथे कन्नड नदीवरील पुलाच बांधकाम, रामटेक-मौदा मार्गाचे चौपदरीकरण त्याचप्रमाणे माथनी गावाजवळ कन्नड नदीवरील पुलाचं मजबुतीकरण या तब्बल 200 कोटींच्यावर निधीच्या तरतुदीने करण्यात येणाऱ्या चार कामांचं भूमिपूजन मौदा वाय जंक्शन त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील गोवरी या ठिकाणी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. या सहा लेन उड्डाणपुलाला मौदा भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत महादेव वाडीभस्मे यांचे नाव देण्याचे आश्वासनदेखील गडकरी यांनी यावेळी दिले.

उमरेड ते अंभोरा आणि पवनी ते भंडाराकडे जाणाऱ्या रस्त्यालासुद्धा पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्याने चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भूमीपूजन झालेल्या बांधकामामुळे मौदामधील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची दुरस्ती होणार होईल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितलं की, या भूमिपूजनामुळे या तालुक्यातील दळणवळणाची सुविधा चांगली होणार असून हा मौदा, बुटीबोरी, उमरेड, कुही तालुक्याकरिता आनंदाचा क्षण आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार यांनी या चारही प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

या चारही प्रकल्पामुळे दळणवळणाची सुविधा देणाऱ्या अत्याधुनिक रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन यामार्फत सुलभ सुरक्षित प्रवास आणि मालवाहतूक होणार आहे तसेच वेळ आणि इंजिनाची बचत होऊन वाहतुकीची कोंडीसुद्धा टळणार आहे.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content