Homeपब्लिक फिगरमौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

मौदामधल्या पूल-रस्त्यांमुळे व्यवसायवृद्धी!

नागपूरच्या मौदा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन  झाल्यामुळे रामटेक आणि मौदा हे तालुके उमेरड आणि कुही तालुक्यांना जोडले जातील तसेच या पुलामुळे नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना कनेक्टेव्हिटी मिळून येथील व्यवसायालादेखील चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मौदा येथे केले.  

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपूलांच बांधकाम, गोवरी कोरगाव राजोला मौदा येथे कन्नड नदीवरील पुलाच बांधकाम, रामटेक-मौदा मार्गाचे चौपदरीकरण त्याचप्रमाणे माथनी गावाजवळ कन्नड नदीवरील पुलाचं मजबुतीकरण या तब्बल 200 कोटींच्यावर निधीच्या तरतुदीने करण्यात येणाऱ्या चार कामांचं भूमिपूजन मौदा वाय जंक्शन त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील गोवरी या ठिकाणी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. या सहा लेन उड्डाणपुलाला मौदा भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत महादेव वाडीभस्मे यांचे नाव देण्याचे आश्वासनदेखील गडकरी यांनी यावेळी दिले.

उमरेड ते अंभोरा आणि पवनी ते भंडाराकडे जाणाऱ्या रस्त्यालासुद्धा पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्याने चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भूमीपूजन झालेल्या बांधकामामुळे मौदामधील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची दुरस्ती होणार होईल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितलं की, या भूमिपूजनामुळे या तालुक्यातील दळणवळणाची सुविधा चांगली होणार असून हा मौदा, बुटीबोरी, उमरेड, कुही तालुक्याकरिता आनंदाचा क्षण आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार यांनी या चारही प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

या चारही प्रकल्पामुळे दळणवळणाची सुविधा देणाऱ्या अत्याधुनिक रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन यामार्फत सुलभ सुरक्षित प्रवास आणि मालवाहतूक होणार आहे तसेच वेळ आणि इंजिनाची बचत होऊन वाहतुकीची कोंडीसुद्धा टळणार आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content