Homeहेल्थ इज वेल्थज्येष्ठ नागरिकांनो, कोविडपासून...

ज्येष्ठ नागरिकांनो, कोविडपासून सावधान!

महाराष्ट्रात सध्या कोविड तसेच एच३एन२ डोके वर काढत असून याला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मास्कचा वापर करावा. याशिवाय त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना सावधानता बाळगावी, असे आवाहन राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे.

मुंबईत सध्या कोविड व एच३एन२चे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत असून मुंबई महानगरपालिका आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र कोविडसंदर्भात टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग ही त्रिसूत्री तसेच कोविड रुग्ण आयसोलेशन व क्वारंटाईन पाळली जात नाही. तसेच मुंबईकरांच्या मनात कोविडची भीती राहिली नसल्याने अपेक्षित कोविड अट्रीब्युटेड बिहेव्हियर ते पाळत नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ. दीपक सावंत यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नुकतीच भेट घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.

कोविड व एच३एन२ संदर्भात आपण बैठक बोलवावी अशी विनंती त्यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली होती. त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना ही बैठक आयोजित करावी अशी सूचना दिली होती. यावेळी पालिका उपायुक्त रणजित ढाकणे, उपायुक्त विश्वास शंकरवार, के पूर्वचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज, एच पश्चिमचे विनायक विसपुते, के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण, आर मध्यच्या संध्या नांदेडकर आदी उपस्थित होते.

लसीकरणाची टक्केवारी घसरली असून बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक तयार नाहीत. लसीकरणाचे फायदे व त्याची परिणामकारकता ६/८ महिनेच राहू शकते. त्यामुळे वॅक्सिन घेणे आवश्यक आहे. प्रसिद्धीमाध्यमातून वॅक्सिनचा तुटवडा असल्याचे डॅा. सावंत यांनी लक्षात आणून दिले असता आपण वॅक्सिनचा पुरवठा करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. वॅक्सिनशिवाय ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले लोक यांना संसर्गापासून दूर ठेवणे कठीण आहे. तसेच एच३एन२साठी बायोफायर टेस्ट सेव्हन हिल्स येथे सुरू करण्यासाठी १ कोटी रूपयांची गरज आहे. तो निधी महानगरपालिकेने लवकर उपलब्ध करून द्यावा. इतर रूग्णालयांतही ही सुविधा उपलब्ध करावी अशी आग्रही मागणी डॉ. सावंत यांनी या बैठकीत केली.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content