Homeटॉप स्टोरीआयइपीएफए आणि डीबीएस...

आयइपीएफए आणि डीबीएस बँक करणार फसव्या योजनांबद्दल जागरूकता

केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयइपीएफए) आणि आशिया आणि आग्नेय आशियामधील प्रमुख वित्तीय संस्था, डीबीएस बँक यांच्यातल्या सामंजस्य करारावर काल नवी दिल्लीत स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार, डीबीएस बँकेचे उद्दिष्ट विविध डिजिटल मंचाद्वारे सुरक्षा संदेश प्रसारित करून आयईपीएफएच्या गुंतवणूकदारांमध्‍ये जागरूकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देणे आहे.

डीबीएस बँकेच्या देशामध्‍ये 19 राज्यांमध्ये शाखा आहेत तसेच एटीएमचे विस्तृत जाळे आहे. बॅंकेने डिजिटल पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. त्‍यांच्या माध्‍यमातून ‘आयइपीएफए’च्या गुंतवणूकदार जागरूकता आणि अंतिम वापरकर्त्यांपर्यंत संरक्षण संदेश पोहोचविण्‍याचे काम चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होणार आहे.

आयइपीएफए च्या गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांमध्‍ये नागरिकांचा सहभाग आण‍ि पोहोच वाढवी आणि प्रतिबद्धता सुनिश्चित करण्यासाठी डीबीएस बँक आपल्या विविध डिजिटल मंचाचा वापर करणार आहे. यामध्‍ये बँकिंग व्यवहारादरम्यान ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एटीएम स्क्रीनवर सुरक्षा संदेश प्रदर्शित करणे आणि तसेच ऑनलाईन व्यवहार केले जात असताना सुरक्षितता संदेश ठळक वैशिष्ट्यांसह प्रसारित करणे. व्हॉट्सॲप आणि इतर संदेश पद्धतीने डीबीएस बँकेच्या शाखांमधील डिजिटल स्क्रीनवर ते संदेश दाखवणे. अधिकाधिक ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि डीबीएस बँकेच्या समाजमाध्‍यमांच्या खात्यांवर सुरक्षा संदेश पोस्ट करण्यात येणार आहेत.

यापूर्वी, ‘आयइपीएफए’ने बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय बँकेबरोबर अशा प्रकारचे सामंजस्य करार केले आहेत. ‘आयइपीएफए’ने स्थापनेपासून, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि आर्थिक फसवणुकीपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी गुंतवणूकदारांना सक्षम करणे या उद्देशाने अनेक गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content