Homeकल्चर +आरोग्य विज्ञान विद्यापीठात...

आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अवघा रंग एक झाला’!

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गणेशोत्सवानिमित्त ‘अवघा रंग एक झाला’ नाटकाचे नुकतेच अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)समवेत लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, बोधीकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील, ब्रिग. सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणण्यासाठी कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाची ओळख व अध्यात्मिक भाव यांचा अनोखा मेळ ’अवघा रंग एक झाला’ नाटकाचे अभिवाचन अनुभवण्यास मिळाला, असे कुलगुरु कानिटकर यांनी सांगितले.

सुप्रसिध्द लेखिका व दिग्दर्शिका पल्लवी पटवर्धन लिखित नाटकाचे अभिवाचन पल्लवी पटवर्धनसमवेत श्रीराम गोरे, श्रीया जोशी, रेखा देशपांडे, अमोघी कुलकर्णी, सुगंधा शुक्ल या सहकलाकारांनी केले तसेच वंदन वेलदे यांनी संगीत दिले. या अभिवाचनातून पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा अनुभव, प्रसंग व भक्तीचा लेखजोखा आपल्या ओजस्वी वाणीत मांडला. अभिवाचनात सहभागी कलाकारांचा कानिटकर यांच्या हस्ते रोपटे व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे समन्वयन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव डॉ. स्वप्नील तोरणे, सदस्य संदीप राठोड, मधुकर भिसे, संदीप महाजन, निलेश ओहोळ, आकांक्षा भोईर, आरती आहेर, नाना परभणे, रविंद्र रांधव यांनी परिश्रम घेतले.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content