Homeचिट चॅटआंतरशालेय जंप रोप...

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही साधू वासवानी हायस्कूल) यांनी सुवर्णपदके जिंकली. ४×४ स्पीड रिले शर्यतीत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात साधू वासवानी हायस्कूलने पहिला क्रमांक मिळवला. सुवर्णपदक विजेत्या संघात रितू शिंदे, जयानी अंबोरे, प्रिया सोनी, स्नेहा प्रजापती यांचा समावेश होता.

मुलांच्या याच गटात याच रिले शर्यतीत ऋषीकुल विद्यालय, घाटकोपर (पूर्व) यांनी अव्वल क्रमांक मिळवला. सुवर्णपदक विजेत्या ऋषीकुल विद्यालय संघात युग पटेल, मान पटेल, मान मारु, नम्रा वसंत या चौघांचा समावेश होता. स्पर्धेत पंच म्हणून अमन वर्मा, विदेश मोरे, पंकज कुमावत, ईशान पुत्रन यांनी काम पाहिले. मुंबई उपनगरातील शाळांचा सहभाग स्पर्धेत होता. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ प्रसिद्ध कुस्तीपटू, पॉवरलिफ्टर खेळाडू दिक्षा दिवे, ग्रीन एकर स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक कुणाल रहाते, ॲमॅच्युर जंप रोप संघटनेच्या वर्षा काळे आणि योगेश सांगळे या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content