Homeकल्चर +'असा हा धर्मवीर…'...

‘असा हा धर्मवीर…’ सोशल मीडियावर

हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘धर्मवीर – २’ या आगामी चित्रपटातील ‘असा हा धर्मवीर…’ हे गाणं नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या ट्रेलरमुळे रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २७  सप्टेंबरला हा चित्रपट मराठी आणि हिंदी, या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

धर्मवीर

आनंद दिघेंची वेगवेगळी रुपं दाखवणारं, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारं असे हे गाणं आहे. विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या ह्या गीताला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अविनाश – विश्वजीत या जोडीने संगीत दिले असून प्रसिद्ध बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाण रेकॉर्ड करण्यात आले आहे.

धर्मवीर

‘धर्मवीर – २’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती. त्यामुळे ‘धर्मवीर – २’मधील गाण्यांविषयीही कमालीची उत्सुकता आहे.

धर्मवीर

सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघे या गाण्यात दिसतात. या गाण्यातून साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडते. त्यामुळे आता चित्रपटात साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली आहे याचे सर्वसामान्य लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

धर्मवीर

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content