Homeबॅक पेजअर्पित पांडेने जिंकली...

अर्पित पांडेने जिंकली मंगला अडसूळ स्मृती बुद्धिबळ स्पर्धा     

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित मंगला अडसूळ स्मृती चषक खुली जलद बुद्धीबळ स्पर्धा फिडे गुणांकित बुद्धिबळपटू अर्पित पांडेने जिंकली. सातव्या साखळी फेरीपर्यंत सर्व सामने जिंकणाऱ्या अर्पितने निर्णायक आठव्या फेरीमध्ये सावध खेळ करीत रचित गुरनानीविरूद्ध २८व्या मिनिटाला बरोबरी साधली आणि सर्वाधिक ७.५ साखळी गुणांसह अजिंक्यपदाला गवसणी घातली.

विजेत्या अर्पित पांडेला रुपये दहा हजार पुरस्कारासह विजेतेपदाचा मंगला अडसूळ स्मृती चषक देऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी गौरविले. यावेळी को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियनचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल व खजिनदार प्रमोद पार्टे, मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.

को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुद्धिबळ संघटना सहकार्यीत स्पर्धेमध्ये रुपये सहा हजारसह द्वितीय पुरस्कार फिडे गुणांकित बुद्धिबळपटू रचित गुरनानीने (६.५ गुण) पटकाविला. १५ वर्षीय अरेना कॅन्डिडेट मास्टर अरविंद अय्यरने (६.५ गुण) तृतीय, फिडे मास्टर मिथिल आजगावकरने (६.५ गुण) चौथा, १८ वर्षीय फिडे मास्टर अनिरुद्ध पोतवाडने (६ गुण) पाचवा, अनिकेत बापटने (६ गुण) सहावा, वंश अग्रवालने (६ गुण) सातवा, जीत शाहने (६ गुण) आठवा, गुरुप्रसाद कुळकर्णीने (६ गुण) नववा, सोहम पवारने (६ गुण) दहावा, योहान बोरीचाने (६ गुण) अकरावा तर फिडे मास्टर वेदांत नगरकट्टेने (५,५ गुण) बारावा पुरस्कार मिळविला.

स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सातारा आदी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ५१ बुद्धिबळपटूसह १०४ खेळाडूंनी चुरशीच्या लढती दिल्या. को-ऑप. बँक एम्पलॉईज युनियन-मुंबईतर्फे एकूण रु. ४१,००० /- आणि आकर्षक ७५ चषकांचा पुरस्कार शालेय व खुल्या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना देण्यात आला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content