Homeहेल्थ इज वेल्थमुंबईत यंदापासून सुरू...

मुंबईत यंदापासून सुरू होणार आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय

मुंबईत आणखी एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैत्रणिक वर्षापासून म्हणजेच २०२४-२५ पासून ५० विद्यार्थी प्रवेशसंख्येचे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. मुंबईत सध्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय चालविले जाते.

गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय ३१ जानेवारी २०१२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्याच्यादृष्टीने त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही व

कागदपत्रांच्या पूर्ततेचे निकष पूर्ण करण्यात आले आहेत. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास अनुमती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील शैक्षणिक वर्षापासून ही विद्यार्थीसंख्या वाढविण्यात येईल. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोकुळदास तेजपाल रुग्णालय व कामा रुग्णालयांशी संलग्न असेल. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून दक्षिण मुंबईतील जनतेला रुग्णसेवा तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे सर्व विभागाच्या समन्वयातून हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्यात येत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content