Homeएनसर्कलराष्ट्रपती भवनातले अमृत...

राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यान 2 फेब्रुवारीपासून जनतेसाठी खुले!

उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत, राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 2 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत जनतेला पाहण्यासाठी खुले राहणार आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी राखून ठेवलेला सोमवारचा दिवस वगळता आठवड्यातले इतर सहा दिवस सामान्य नागरिक या उद्यानाला भेट देऊ शकतात.

हे अमृत ​​उद्यान खालील दिवशी विशेष वर्गांसाठी खुले राहील.

22 फेब्रुवारी- दिव्यांग व्यक्तींसाठी

23 फेब्रुवारी- संरक्षण, निमलष्करी आणि पोलीस दलातील जवानांसाठी

१ मार्च– महिला आणि आदिवासी महिला बचत गटांसाठी

5 मार्च– अनाथाश्रमातील मुलांसाठी

अभ्यागतांना सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या या सहा तासांच्या कालावधीमध्येच भेट देण्याची परवानगी असेल. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच्या या दोन तासांच्या कालावधीमध्ये आठवड्याच्या इतर दिवशी 7,500 अभ्यागत प्रवेश क्षमता असेल आणि आठवड्याच्या शेवटी प्रत्येक ठराविक कालावधीमध्ये 10,000 अभ्यागत एवढी प्रवेश क्षमता असेल. दुपारच्या चार तासांच्या कालावधीकरिता क्षमता (दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत) आठवड्याच्या इतर दिवशी प्रत्येक ठराविक कालावधी करिता 5,000 एवढी अभ्यागत प्रवेश क्षमता असेल आणि आठवड्याच्या शेवटी 7,500 अभ्यागत एवढी प्रवेश क्षमता असेल. या उद्यानाला भेट देण्यासाठी नागरिकांना खालील संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

https://visit.rashtrapatibhavan.gov.in/visit/amrit-udyan/rE 

या उद्यानाला प्रत्यक्ष भेट देणाऱ्या अभ्यागतांना राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 12 जवळील सुविधा केंद्रावर किंवा स्वयं नोंदणी सुविधेवर (सेल्फ सर्व्हिस कियॉस्क) स्वतःची नोंद करावी लागेल.

या उद्यानाला भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांना राष्ट्रपती भवनातील फाटक क्रमांक 35मधून प्रवेश दिला जाईल आणि त्याच फाटकातून बाहेर पडता येईल (जिथे राष्ट्रपती भवनाला उत्तर दिशेकडील रस्ता येऊन मिळतो). या उद्यानाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या सोयीसाठी, केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35पर्यंत शटल बस सेवा सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान दर 30 मिनिटांच्या अंतराने उपलब्ध असेल.

या आपल्या भेटीदरम्यान, अभ्यागतांना बोन्साई गार्डन, म्युझिकल फाउंटन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आणि सर्कुलर बागांचा अनुभव घेता येईल. बाहेर पडताना अभ्यागतांसाठी जेवण्याची सुविधादेखील उपलब्ध असेल.

अभ्यागत, आपल्या लहान मुलांसाठी मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक चाव्या, पर्स/हँडबॅग, पाण्याच्या बाटल्या आणि दुधाच्या बाटल्या सोबत घेऊन जाऊ शकतात. सार्वजनिक मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये आणि प्रथमोपचार/वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली जाणार आहे.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content