Homeटॉप स्टोरीपाकच्या निर्बंधांमुळे विमानप्रवास...

पाकच्या निर्बंधांमुळे विमानप्रवास लांबणार! कंपन्यांना सज्जतेचे निर्देश!!

काश्मिरमधल्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांना प्रत्त्युत्तर देताना पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र भारतीय विमानांकरीता बंद केले आहे. हवाई क्षेत्रावरील या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुविधा, सुरक्षितता आणि नियामक अनुपालनाची खात्री करताना विमान कंपन्यांनी प्रवाशांना मार्गातले बदल, प्रवासाचा वाढलेला कालावधी आदी सर्व बाबींची तपशीलात माहिती द्यावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

अलीकडील आंतरराष्ट्रीय हवाईक्षेत्रबंदी आणि ओव्हरफ्लाइट निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, अनेक उड्डाण मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे उड्डाणाचा कालावधी वाढला आहे आणि अतिरिक्त तांत्रिक थांबे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची सुविधा, सुरक्षितता आणि नियामक अनुपालनाची सुनिश्चिती करण्यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) यांनी सर्व विमान कंपन्यांना त्वरित प्रभावाने वाढीव प्रवासी हाताळणीचे उपाय लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रवाशांना मार्गातील बदल, वाढलेला प्रवास वेळ आणि त्यांच्या प्रवासादरम्यान कोणत्याही तांत्रिक थांब्यांविषयी माहिती दिली पाहिजे. हा संवाद चेक-इन, बोर्डिंग आणि डिजिटल अलर्टद्वारे केला पाहिजे. विमान कंपन्यांना वास्तविक ब्लॉक वेळेच्या आधारे केटरिंगमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे संपूर्ण उड्डाणात पुरेसे अन्न, पाणी आणि विशेष जेवणाची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यात तांत्रिक थांब्याचाही समावेश आहे. विमान कंपन्यांनी विमानात वैद्यकीय बाबींचा पुरवठा पुरेसा आहे याची खात्री करावी. संभाव्य तांत्रिक थांब्यावर आपत्कालीन सेवांची उपलब्धता पडताळावी, असे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.

कॉल सेंटर आणि ग्राहक सेवा पथकांनी विलंब, हाताळण्यासाठी आणि लागू नियमांनुसार आवश्यकतेनुसार मदत किंवा भरपाई देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. उड्डाण कार्यान्वयन, ग्राहकसेवा, ग्राउंड हँडलिंग, इनफ्लाइट सेवा आणि वैद्यकीय भागीदारांमध्ये अखंड समन्वय आवश्यक आहे. सर्व विमान कंपन्यांना हे निर्देश अनिवार्य मानण्यास सांगण्यात आले आहे. या निर्देशांचे पालन न केल्यास लागू असलेल्या नागरी विमान वाहतूक आवश्यकता अंतर्गत कारवाई होऊ शकते. हे निर्देश तत्काळ लागू झाले आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत ते लागू राहतील.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content