Homeएनसर्कलट्रक केबिनमध्ये एअर...

ट्रक केबिनमध्ये एअर कंडिशन सिस्टम अनिवार्य!

दिनांक 1 ऑक्टोबर 2025पासून निर्मित एन 2 आणि एन 3 श्रेणीच्या मोटर वाहनांच्या केबिन्समध्ये एअर कंडिशन सिस्टम स्थापित करणे बंधनकारक करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे.

वातानुकूलन यंत्रणेसह स्थापित केबिनची चाचणी, वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या IS 14618: 2022, नुसार होईल.

अधिसूचनेनुसार 1 ऑक्टोबर, 2025 रोजी किंवा नंतर एन 2 आणि एन 3 श्रेणीचे कोणतेही ड्राइव-अवे चेसिस (अपूर्ण स्वरूपातील इंजिन क्षमता 25 सीसी असलेले वाहन) स्वरूपात उत्पादित केलेल्या वाहनात, उत्पादक IS 14618:2022 नुसार वातानुकूलन प्रणालीचा मंजूर संचाचा प्रकार पुरवेल.

वाहतूक मंत्रालयाने 10 जुलै  2023 रोजी मसुदा अधिसूचना जारी करून संबंधितांकडून सूचना मागवल्या होत्या.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content