Homeचिट चॅटटपाल खात्यातल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी...

टपाल खात्यातल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी 7 ऑगस्टला अदालत

भारतीय टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी येत्या 7 ऑगस्टला दुपारी 3 वाजता गोव्यातील पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात, गोवा टपाल विभागाची (ज्यामध्ये महाराष्ट्रातील गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांचादेखील समावेश आहे) टपाल विभाग निवृत्तीवेतन अदालत आयोजित केली जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज विहित रूपात 26 जुलै 2024 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत, असे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

टपाल विभागातून (टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक) सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्यांच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन लाभासंबंधीच्या तक्रारी तसेच ज्यांच्या निवृत्तीवेतनाच्या तक्रारी 3 महिन्यांच्या आत निकाली काढल्या गेल्या नाहीत अशा तक्रारी या निवृत्तीवेतन अदालतीमध्ये निवारणासाठी विचारात घेतल्या जातील. या टपाल निवृत्तीवेतन अदालतीमध्ये कॅट (CAT) किंवा न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे, वारसाहक्क विवाद आणि धोरणासंबंधीच्या तक्रारी यासारख्या पूर्णपणे कायदेविषयक समस्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

या अदालतीत भाग घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी महेश एन., लेखाधिकारी आणि सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी-403001 या पत्त्यावर किंवा accts.goa@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावर आपल्या तक्रारींचे अर्ज विहित रूपात 26 जुलै 2024 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत. 26 जुलै 2024नंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर निवृत्तीवेतन अदालतीत विचार केला जाणार नाही, असेही टपाल खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content