Homeटॉप स्टोरीअयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे...

अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकवरील उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकव्यतिरिक्त, ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबसारख्या गंभीर आजारांशी झुंजत होते.

आचार्य सत्येंद्र दास यांना 2 फेब्रुवारीला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर सुरुवातीला त्यांना अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर त्यांना प्रगत वैद्यकीय सेवेसाठी लखनौ येथील एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत 3 फेब्रुवारीला न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 फेब्रुवारीला आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एसजीपीजीआयएमएसला भेट दिली होती.

6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हाही दास मुख्य पुजारी होते. मशीद पडण्यापूर्वी त्यांनी मूर्ती जवळच्या फकीरे मंदिरात हलवल्या होत्या आणि मशीद पडल्यानंतर त्यांनी रामजन्मभूमी येथील तात्पुरत्या मंदिरात मूर्ती ठेवल्या होत्या. अयोध्येतील नवीन श्री राम मंदिराच्या अभिषेक समारंभापासून सत्येंद्र दास त्याचे मुख्य पुजारी म्हणून काम करत होते. आचार्य सत्येंद्र दास यांनी नुकताच 11 जानेवारीला अयोध्येच्या नव्याने उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन साजरा केला होता. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आणि आपले जीवन धार्मिक सेवेसाठी समर्पित केले. आचार्य सत्येंद्र दास यांनी 2024च्या “द बॅटल ऑफ अयोध्या” या माहितीपट मालिकेतही काम केले होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content