Homeटॉप स्टोरीअयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे...

अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकवरील उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकव्यतिरिक्त, ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबसारख्या गंभीर आजारांशी झुंजत होते.

आचार्य सत्येंद्र दास यांना 2 फेब्रुवारीला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर सुरुवातीला त्यांना अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर त्यांना प्रगत वैद्यकीय सेवेसाठी लखनौ येथील एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत 3 फेब्रुवारीला न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 फेब्रुवारीला आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एसजीपीजीआयएमएसला भेट दिली होती.

6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हाही दास मुख्य पुजारी होते. मशीद पडण्यापूर्वी त्यांनी मूर्ती जवळच्या फकीरे मंदिरात हलवल्या होत्या आणि मशीद पडल्यानंतर त्यांनी रामजन्मभूमी येथील तात्पुरत्या मंदिरात मूर्ती ठेवल्या होत्या. अयोध्येतील नवीन श्री राम मंदिराच्या अभिषेक समारंभापासून सत्येंद्र दास त्याचे मुख्य पुजारी म्हणून काम करत होते. आचार्य सत्येंद्र दास यांनी नुकताच 11 जानेवारीला अयोध्येच्या नव्याने उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन साजरा केला होता. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आणि आपले जीवन धार्मिक सेवेसाठी समर्पित केले. आचार्य सत्येंद्र दास यांनी 2024च्या “द बॅटल ऑफ अयोध्या” या माहितीपट मालिकेतही काम केले होते.

Continue reading

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...
Skip to content