Homeटॉप स्टोरीअयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे...

अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकवरील उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकव्यतिरिक्त, ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबसारख्या गंभीर आजारांशी झुंजत होते.

आचार्य सत्येंद्र दास यांना 2 फेब्रुवारीला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर सुरुवातीला त्यांना अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर त्यांना प्रगत वैद्यकीय सेवेसाठी लखनौ येथील एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत 3 फेब्रुवारीला न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 फेब्रुवारीला आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एसजीपीजीआयएमएसला भेट दिली होती.

6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हाही दास मुख्य पुजारी होते. मशीद पडण्यापूर्वी त्यांनी मूर्ती जवळच्या फकीरे मंदिरात हलवल्या होत्या आणि मशीद पडल्यानंतर त्यांनी रामजन्मभूमी येथील तात्पुरत्या मंदिरात मूर्ती ठेवल्या होत्या. अयोध्येतील नवीन श्री राम मंदिराच्या अभिषेक समारंभापासून सत्येंद्र दास त्याचे मुख्य पुजारी म्हणून काम करत होते. आचार्य सत्येंद्र दास यांनी नुकताच 11 जानेवारीला अयोध्येच्या नव्याने उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन साजरा केला होता. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आणि आपले जीवन धार्मिक सेवेसाठी समर्पित केले. आचार्य सत्येंद्र दास यांनी 2024च्या “द बॅटल ऑफ अयोध्या” या माहितीपट मालिकेतही काम केले होते.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content