Homeएनसर्कलकपिल पाटील आज...

कपिल पाटील आज करणार ‘निरोगी गावे..’ कार्यशाळेचे उद्घाटन!

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज, 18 जानेवारीला आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे ‘आरोग्यसंपन्न भविष्याच्या दिशेने निरोगी गावे’, या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन होईल.

पंचायती राज मंत्रालय (एमओपीआर) आंध्र प्रदेश सरकारच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाच्या निकट सहकार्याने 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान संकल्पना 2: निरोगी गाव हा संकल्पनात्मक दृष्टिकोन स्वीकारून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण या विषयावर या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

चांगल्या सवयी; आरोग्याच्या मापदंडांवर देखरेख ठेवण्यासाठी पंचायतींची भूमिका, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) मध्ये ग्राम आरोग्य योजनेचे एकात्मीकरण, अनुकरणीय धोरणे, दृष्टिकोन, आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे प्रदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असेल.

ही कार्यशाळा सहकार्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि निकोप भविष्याच्या उभारणीकरिता धोरण आखण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करते. शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी) चे उद्दिष्ट जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी)चे स्थानिकीकरण करणे आणि तळागाळातील विशिष्ट आव्हाने आणि संधींना सामोरे जाणे हे आहे. एलएसडीजी ची संकल्पना 2 म्हणजेच निरोगी गाव ही आरोग्य आणि कल्याणावर भर देणाऱ्या खेड्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.

संकल्पना 2: निरोगी गाव या प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित झालेल्या पंचायतींनाही तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content