Homeबॅक पेजबोरीवलीत जुन्या रेल्वेडब्यात...

बोरीवलीत जुन्या रेल्वेडब्यात साकारण्यात आले रेस्टॉरंट

पश्चिम रेल्वेच्या मुंबईतल्या बोरीवली स्थानकाबाहेरील जुन्या डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्याला ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ असे नाव देण्यात आले आहे. स्थानिक संस्कृतीच्या आधारे या रेस्टॉरंटची सजावट करण्यात आली आहे. नमकीन आणि मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या हल्दीरामने या रेल्वे डब्यात आपले रेस्टॉरंट उघडले आहे. हे ‘हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंट’ म्हणूनही ओळखले जाईल.

रेस्टॉरंटमध्ये एक भव्य डायनिंग हॉल बांधण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतासह सर्व प्रकारचे पदार्थ यामध्ये उपलब्ध असतील. हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंटमध्ये विशेष आसनव्यवस्था आहे. हल्दीराम

फुड्स इंटरनॅशनलचे संचालक नीरज अग्रवाल यांनी सांगितले की, रेल्वे वाहतुकीच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक सुविधा ट्रेनमध्येच उपलब्ध असतील. तसेच जेवणाच्या ताट, नाश्ता इत्यादी २४ तास उपलब्ध असतील.

उपाहारगृहातील कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतील. आईस्क्रीम, भारतीय पदार्थ, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ रात्री 3 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात वापरण्यात येणारे डबे अनुभवायला मिळतील. यामध्ये जुन्या ट्रेनमध्ये असलेल्या राजेशाही साधनांचा आस्वाद घेण्याचा अनुभव मिळणार आहे. तरुणांना या अनुभवाची ओळख करून देण्यासाठी रेल्वेच्या डब्यात एक रेस्टॉरंट तयार करण्यात आले आहे. नीरज अग्रवाल म्हणाले की, हे रेस्टॉरंट केवळ शहरी लोकांसाठीच नाही तर प्रवाशांसाठीही अतिशय उपयुक्त ठरेल.

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content