Homeचिट चॅटऋषभ पंत आणि...

ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा झाले ‘जॉली अँड पॉली’!

भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना ‘जॉली’ आणि ‘पॉली’ या दोन विशिष्ट भूमिकांमध्ये सादर करण्यात आले आहे, जे लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील, याचीही काळजी घेतात. जीवन विम्याबद्दलची जागरूकता वाढत असतानाच एसबीआय लाइफ लोकांच्या दैनंदिन जीवनात हा विषय अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘अपने लिए, अपनो के लिए’ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित, ‘जॉली आणि पॉली’ हे एक साधी पण महत्त्वाची बाजू मांडतात.

कंपनीचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआर विभागाचे प्रमुख रवींद्र शर्मा म्हणाले की, महत्त्वाकांक्षांमध्ये भारत प्रत्येक पिढीमागे बदल अनुभवत आहे, जिथे व्यक्ती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाच, अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगू इच्छितात. आमचा विश्वास आहे की, जीवन विमा हा समतोल साधण्यास मदत करतो. ‘जॉली अँड पॉली’ ही संकल्पना हाच विश्वास सोप्या आणि सहज शब्दात मांडतात. हे दाखवून देतात की, जेव्हा लोक आपल्या जवळच्यांसाठी आर्थिकदृष्ट्या तयार असतात, तेव्हा ते आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. प्रियजनांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षेची खात्री असलेल्या व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात. आमच्या ‘अपने लिए, अपनों के लिए’ हे तत्त्वज्ञान याच दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत तथा जॉली म्हणाला की, आपल्या देशातील तरुणांची स्वप्ने मोठी आहेत आणि त्या स्वप्नांना पंख देण्यासाठी संधी निर्माण करण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. खरंतर, व्यक्तींना भविष्य घडवण्यासाठी सक्षम करण्याच्या या ब्रँडच्या वचनबद्धतेशी मी मनापासून जोडला गेलो आहे. वास्तविक, स्वतःला जे आवडते, ते करावे, त्याचा पाठपुरावा करावा, या तत्त्वावर मी जगतो आणि जॉली म्हणून, मी कुटुंबांना त्यांच्या मुलांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करू देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर रवींद्र जडेजा तथा पॉली म्हणाला की, एसबीआय लाइफचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने मला देशभरातील कुटुंबांशी गप्पा मारण्याची आणि त्यांच्या घरातील संवादाचा एक भाग होण्याची एक अनोखी संधी मिळते. पॉली म्हणून, मी लोकांना विचारपूर्वक नियोजन करण्यास प्रोत्साहित करत आहे, जेणेकरून वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करताना त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी कसलीही तडजोड करावी लागणार नाही. व्यक्ती आणि कुटुंबांना हे पटवून देण्याच्या या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक ध्येय यांचा समतोल साधणे केवळ शक्य ठरवणारेच नाही, तर ते सबलीकरण करणारेदेखील आहे. मला आशा आहे की, आपण एक सांस्कृतिक बदल घडवून आणू आणि एक व्यक्ती – एक कुटूंब याप्रमाणे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करू शकू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी होती अशी फुलांची सजावट

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल झालेल्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दादरच्या शिवाजीपार्क येथील स्मृती स्थळावर विविध फुलझाडांनी तसेच शोभिवंत झाडांनी सजावट केली होती. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मांडणी करण्यात आली. यामध्ये सफेद आणि पिवळ्या रंगाच्या...

‘तिसऱ्या मुंबई’ची दावोसमध्ये मुहूर्तमेढ! रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा!!

मुंबई, नवी मुंबईपाठोपाठ आता रायगड-पेण परिसरात 'तिसरी मुंबई' आकारात येत आहे. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्या मुंबईतले पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. आज प्रामुख्याने धोरणात्मक असे सामंजस्य...

‘वंदे भारत’च्या स्लीपर ट्रेनला उदंड प्रतिसाद, हातोहात तिकिटे बूक!

वंदे भारत स्लीपर ट्रेन (गाडी क्रमांक 27576)च्या कामाख्या (केवायक्यू) आणि हावडा (एचडब्ल्यूएच)दरम्यानच्या पहिल्या व्यावसायिक फेरीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पीआरएस आणि इतर साईट्सद्वारे तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर काही तासांतच गाडीतल्या सर्व जागा आरक्षित झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
Skip to content