Homeचिट चॅटऋषभ पंत आणि...

ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा झाले ‘जॉली अँड पॉली’!

भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना ‘जॉली’ आणि ‘पॉली’ या दोन विशिष्ट भूमिकांमध्ये सादर करण्यात आले आहे, जे लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्याचवेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील, याचीही काळजी घेतात. जीवन विम्याबद्दलची जागरूकता वाढत असतानाच एसबीआय लाइफ लोकांच्या दैनंदिन जीवनात हा विषय अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘अपने लिए, अपनो के लिए’ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित, ‘जॉली आणि पॉली’ हे एक साधी पण महत्त्वाची बाजू मांडतात.

कंपनीचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सीएसआर विभागाचे प्रमुख रवींद्र शर्मा म्हणाले की, महत्त्वाकांक्षांमध्ये भारत प्रत्येक पिढीमागे बदल अनुभवत आहे, जिथे व्यक्ती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत असतानाच, अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगू इच्छितात. आमचा विश्वास आहे की, जीवन विमा हा समतोल साधण्यास मदत करतो. ‘जॉली अँड पॉली’ ही संकल्पना हाच विश्वास सोप्या आणि सहज शब्दात मांडतात. हे दाखवून देतात की, जेव्हा लोक आपल्या जवळच्यांसाठी आर्थिकदृष्ट्या तयार असतात, तेव्हा ते आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. प्रियजनांच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षेची खात्री असलेल्या व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम असतात. आमच्या ‘अपने लिए, अपनों के लिए’ हे तत्त्वज्ञान याच दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर ऋषभ पंत तथा जॉली म्हणाला की, आपल्या देशातील तरुणांची स्वप्ने मोठी आहेत आणि त्या स्वप्नांना पंख देण्यासाठी संधी निर्माण करण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. खरंतर, व्यक्तींना भविष्य घडवण्यासाठी सक्षम करण्याच्या या ब्रँडच्या वचनबद्धतेशी मी मनापासून जोडला गेलो आहे. वास्तविक, स्वतःला जे आवडते, ते करावे, त्याचा पाठपुरावा करावा, या तत्त्वावर मी जगतो आणि जॉली म्हणून, मी कुटुंबांना त्यांच्या मुलांना त्यांच्या आवडीचा पाठपुरावा करू देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर रवींद्र जडेजा तथा पॉली म्हणाला की, एसबीआय लाइफचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याने मला देशभरातील कुटुंबांशी गप्पा मारण्याची आणि त्यांच्या घरातील संवादाचा एक भाग होण्याची एक अनोखी संधी मिळते. पॉली म्हणून, मी लोकांना विचारपूर्वक नियोजन करण्यास प्रोत्साहित करत आहे, जेणेकरून वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करताना त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी कसलीही तडजोड करावी लागणार नाही. व्यक्ती आणि कुटुंबांना हे पटवून देण्याच्या या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. वैयक्तिक आकांक्षा आणि कौटुंबिक ध्येय यांचा समतोल साधणे केवळ शक्य ठरवणारेच नाही, तर ते सबलीकरण करणारेदेखील आहे. मला आशा आहे की, आपण एक सांस्कृतिक बदल घडवून आणू आणि एक व्यक्ती – एक कुटूंब याप्रमाणे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करू शकू.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content