Homeन्यूज अँड व्ह्यूजवाड्यातला रस्ता २०...

वाड्यातला रस्ता २० वर्षे अर्धवट!

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे बंधनकारक असते. खरेतर तालुका पंचायत समितीने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु संपूर्ण वाडा तालुक्यात असेच अर्धवट रस्ते बांधलेले दिसतात.

एका औषध दुकानदाराने सांगितले की, गेली सुमारे २० वर्षे रस्ते असेच अर्धवट अवस्थेत आहेत. वाडा ग्रामपंचायत समितीच्या आजूबाजूचा रस्ताही असाच आहे. इतकेच नव्हे तर बाजूला एक बांधकामाचे साहित्य विक्रीचे दुकान असून त्या दुकानात विक्रीला आणलेली माती वा वाळूही हा दुकानदार बाजूच्या रस्त्यावरच ठेवतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूलाही बरेच टेम्पो उभे करून ठेवलेले असतात. एसटी आगाराच्या समोरच सरकारी रुग्णालय आहे. आसपास बाजारपेठही आहे. सकाळ-संध्याकाळ येथे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. अनेकवेळा या चौकात वाहतूककोंडी होते. मी जवळजवळ दोन दिवस या परिसरात होतो. पण साधा पोलीस हवालदारही येथे दिसला नाही. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या परिसरातील उमेदवारांनी रस्त्याच्या परिस्थिती तसेच वाहतूककोंडीबाबत ठोस निर्णय घ्यावेत ही अपेक्षा!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आव्हान भाजप-शिवसेनेपुढचे!

राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई महापालिकाही त्यांनी पहिल्याच फटक्यात ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. राज्यातील अन्य महापालिका जिंकणे आणि मुंबई...

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...
Skip to content