Homeन्यूज अँड व्ह्यूजवाड्यातला रस्ता २०...

वाड्यातला रस्ता २० वर्षे अर्धवट!

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे बंधनकारक असते. खरेतर तालुका पंचायत समितीने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु संपूर्ण वाडा तालुक्यात असेच अर्धवट रस्ते बांधलेले दिसतात.

एका औषध दुकानदाराने सांगितले की, गेली सुमारे २० वर्षे रस्ते असेच अर्धवट अवस्थेत आहेत. वाडा ग्रामपंचायत समितीच्या आजूबाजूचा रस्ताही असाच आहे. इतकेच नव्हे तर बाजूला एक बांधकामाचे साहित्य विक्रीचे दुकान असून त्या दुकानात विक्रीला आणलेली माती वा वाळूही हा दुकानदार बाजूच्या रस्त्यावरच ठेवतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूलाही बरेच टेम्पो उभे करून ठेवलेले असतात. एसटी आगाराच्या समोरच सरकारी रुग्णालय आहे. आसपास बाजारपेठही आहे. सकाळ-संध्याकाळ येथे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. अनेकवेळा या चौकात वाहतूककोंडी होते. मी जवळजवळ दोन दिवस या परिसरात होतो. पण साधा पोलीस हवालदारही येथे दिसला नाही. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या परिसरातील उमेदवारांनी रस्त्याच्या परिस्थिती तसेच वाहतूककोंडीबाबत ठोस निर्णय घ्यावेत ही अपेक्षा!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...
Skip to content