Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा...

ठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा देवपिता आहे तरी कोण?

ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ ‘आंदण’ दिलेले आहेत काय? हे जाहीरच करून टाकले तर बरे होईल. कारण, उठसुठ काही नियम आले की बंडाचा झेंडा हातात घेणारे व्यापारी बंधू (?) जनतेच्या हक्काचे असलेले पदपथही मोकळे सोडायला तयार होत नाहीत. देशात वा राज्यात कुठेही रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग असतानाही गेले तीन दिवस काही कारणाने राममारुती रोडवर कामानिमित्त येणेजाणे झाले तेव्हा पदपथ गायबच असलेले दिसले. शिवाय कुणीतरी बड्या आसामीने आपल्या पित्याच्या आठवणीसाठी बांधलेल्या इमारतीने तर पदपथ गिळंकृत केलेला दिसला. तेथेच त्यांनी आपल्या गाडीसाठी उतरण्ड तयार केलेले दिसले.

त्याच्यापुढे तर एका दुकानदाराने आपल्या दुकानाची पायरीच पदपथावर आणली आहे. याचा अर्थच या व्यापारी मंडळीचा ‘देवपिता’ कुणी सॉलिड माणूस असणार हे उघडच आहे. कारण महापालिका प्रशासन वा पोलीस / वाहतूक प्रशासनाला न जुमानण्याची हिंमत ‘देवपित्या’शिवाय होणारच नाही.. म्हणजे आता येत्या नववर्षापर्यन्त गोखले रोड, राममारुती रोडवरील वाहतूककोंडीबाबत बोलायलाच नको. आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष दयावे, असे वाटायला लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तुमचे श्रीराम तर माझी सीतामैय्या! नितीशबाबूही लागले भजनी!!

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भव्यदिव्य राममंदिर बांधून देशातील मतदारांचे डोळे दिपवले होते, हे सर्वजण जाणतात! आता काही दिवसांतच बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. नेमका हाच मुहूर्त साधून बिहारचे मुख्यमंत्री नितीशबाबूंनी 'जानकी जन्मस्थल...

‘त्या’ बेवारस बोटीबाबत जाबजबान्या झाल्या तरी कुणाच्या?

आजकाल राज्यात वा केंद्रात जरा काही खुट्ट वाजले की उच्चस्तरीय चौकशी वा विशेष दक्षता पथकाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जाते. याच धर्तीवर सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सापडलेल्या बेवारस बोट व त्यातील...

देवाभाऊ गरिबांची कशाला चेष्टा करता?

आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सत्ता व विरोधी पक्षांतील राजकीय नेते राज्यातील जनतेच्या तोंडावर कुठलेही आश्वासन फेकतील. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व महापालिकांमधील निवडणुका होणार आहेत. अन्य कुठल्याही राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येते. परंतु मुख्यमंत्रीपदावरील हुशार व्यक्तीने (देवाभाऊ)...
Skip to content