Homeबॅक पेजहर्षवर्धन चितळे हिरो...

हर्षवर्धन चितळे हिरो मोटोकॉर्पचे नवे सीईओ

हिरो मोटोकॉर्पने हर्षवर्धन चितळे यांना कंपनीचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केले आहे. हे पद ते ५ जानेवारी २०२६पासून सांभाळतील. सध्या हे पद विक्रम कसबेकर सांभाळत असून ते हे पद सोडतील. मात्र, ते कंपनीत तंत्रज्ञानप्रमुख (Chief Technology Officer) आणि कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून काम करत राहतील.

चितळे यांचा अनुभव

चितळे यांनी सिग्निफाय या युरोपियन लाइटिंग कंपनीत “Global CEO, Professional Business” या पदावर काम केले आहे. त्याद्वारे त्यांनी देशांतले सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताळले आहे. बरीच उत्पादने व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प यांचाही त्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी फिलिप्स लाइटिंग इंडिया, HCL Infosystems आणि Honeywell Automation India यासारख्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ नेतृत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हिरोचा दृष्टीकोन कोणत्या दिशेने?

हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाळ यांच्या मते, चितळे यांच्या नेतृत्त्वाखाली हिरो पुढे “इलेक्ट्रिक मोबिलिटी, नव्या मोबिलिटी सोल्यूशन्स, प्रीमियम उत्पादनं, डिजिटायझेशन, आणि शाश्वततेच्या दिशेने” वेगाने वाटचाल करेल, अशी माहिती रवींद्र खांडेकर यांनी दिली.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content