Homeबॅक पेजहर्षवर्धन चितळे हिरो...

हर्षवर्धन चितळे हिरो मोटोकॉर्पचे नवे सीईओ

हिरो मोटोकॉर्पने हर्षवर्धन चितळे यांना कंपनीचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्त केले आहे. हे पद ते ५ जानेवारी २०२६पासून सांभाळतील. सध्या हे पद विक्रम कसबेकर सांभाळत असून ते हे पद सोडतील. मात्र, ते कंपनीत तंत्रज्ञानप्रमुख (Chief Technology Officer) आणि कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून काम करत राहतील.

चितळे यांचा अनुभव

चितळे यांनी सिग्निफाय या युरोपियन लाइटिंग कंपनीत “Global CEO, Professional Business” या पदावर काम केले आहे. त्याद्वारे त्यांनी देशांतले सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताळले आहे. बरीच उत्पादने व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प यांचाही त्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी फिलिप्स लाइटिंग इंडिया, HCL Infosystems आणि Honeywell Automation India यासारख्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ नेतृत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हिरोचा दृष्टीकोन कोणत्या दिशेने?

हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाळ यांच्या मते, चितळे यांच्या नेतृत्त्वाखाली हिरो पुढे “इलेक्ट्रिक मोबिलिटी, नव्या मोबिलिटी सोल्यूशन्स, प्रीमियम उत्पादनं, डिजिटायझेशन, आणि शाश्वततेच्या दिशेने” वेगाने वाटचाल करेल, अशी माहिती रवींद्र खांडेकर यांनी दिली.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content