Homeचिट चॅटमलबार हिल बॅडमिंटनः...

मलबार हिल बॅडमिंटनः काव्या, अभिमन्यू, अनुश्री, विवान, रुद्रा, आदित्य, ओम विजेते

मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या विद्यमाने मुंबईतल्या मलबार हिल क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या मुला-मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत काव्या कुमार, अभिमन्यू शेटे, अनुश्री मोडलींबकर, विवान वायंगणकर, रुद्रा गावडे, आदित्य पडवळ, ओम दाबेकर यांनी विजेते पदाचा मान मिळवला.

या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार येथील अकादमीचे सदस्य असलेले खेळाडू सहभागी झाले होते. अकादमीची ही ११७वी स्पर्धा होती. मलबार हिल क्लबचे सोहम दारुवाला, भैरव सेठ, बॉम्बे  जिमखान्याचे कुणाल राव यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. योनेक्स, मलबार हिल क्लबचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला मिळाले. अकादमीचे संचालक मनोहर गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचा अंतिम निकालः

मुली:

११ वर्षांंखालील: काव्या कुमार वि. वि. आर्या जोशी, १३ वर्षांंखालील: अनुश्री मोडलींबकर वि. वि. तनया राणे, १५ वर्षांंखालील: रुद्रा गावडे वि. वि. सनया ठक्कर

मुले:

११ वर्षांंखालील: अभिमन्यू शेटे वि. वि. अगस्त्या समताने, १३ वर्षांंखालील: विवान वायंगणकर वि. वि. विवान गद्रे, १५ वर्षांंखालील: आदित्य पडवळ वि. वि. विहान राठी, १७ वर्षांंखालीलः ओम दाबेकर वि. वि. शोबीत कर्नक

Continue reading

येत्या १७ एप्रिलपासून बोरिवलीत रंगणार ‘अजिंक्यतारा’ मल्लखांब स्पर्धा

मल्लखांब लव संघ आणि सुविद्या प्रसारक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १७ ते १९ एप्रिल २०२६दरम्यान सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत स्कूल ऑफ एनवायरन्मेंट ऍण्ड आर्किटेक्चर (एक्सर सुविद्या शाळा), एक्सर रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई येथे मल्लखांबातील अनभिषिक्त...

आता सोने-चांदी-प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीला लागणार परवाना!

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, या दागिन्यांची आयात आता ‘फ्री’ ऐवजी ‘रिस्ट्रिक्टेड’ श्रेणीत टाकण्यात आली असून, आयातीसाठी पूर्वपरवानगी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...
Skip to content