Homeमाय व्हॉईससायनला मुंबईच्या दोन्ही...

सायनला मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी चालून दाखवावेच!

“मुकी बिचारी कुणीही आणि ‘कशीही’ हाका…” मुंबईच्या शीव (सायन) येथील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले आहे. हा पूल पाडण्याआधी जनतेला त्रास होईल, वाहतुकीचे काय होईल आदी अनेक प्रश्न घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी एकच कल्ला केला होता, हे जनता अजून विसरलेली नाही. जनतेची काळजी आम्हालाच आहे, अशा आविर्भावात सर्व आंदोलने सुरु हॊती. अखेर सर्वसमंतीने पूल पाडून नवे बांधकाम सुरु करण्याबाबत एकमत झाले. मात्र, पूल पाडल्यानंतर शीव रेल्वेस्थानकात उतरणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या हालाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी ‘अर्थपूर्ण मौन’ स्वीकारल्याचे दिसत आहे.

काही कामानिमित्त दोन दिवस शीव येथे जावे लागले. पूर्वेकडे जाताना कसरत करावी लागत आहे. नवीन पूल होणार आहे म्हणून जनता हेही सहन करत आहे. परंतु या महानगरातील रेल्वेसकट सर्व यंत्रणा जनतेची जीवघेणी परीक्षाच घेत असल्याचा संतापजनक अनुभव यावेळेस आला! जेमतेम दोन फूट रुंद असलेल्या जागेतून प्रवाशांनी मार्ग कसा काढायचा याचे प्रात्यक्षिक मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी एकदोनदा करूनच दाखवावे असे माझे आव्हान आहे! एका पालकमत्र्यांना तर या दोन फुटाच्या रस्त्यावरून सरळ रेषेत चालताच येणार नाही, याबाबत मी बेट लावायला तयार आहे.

या अरुंद पायवाटेत खाचखळगे नसते तर आश्चर्य वाटले असते. तेही बरोबर घेऊन नोकरदार मंडळींना कामावर जावे लागत आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुमारे तीन वर्षेतरी चालणारच. मग तीन वर्षे जनतेनेही हे हाल स्वीकारायचे का? शहर नियोजन करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे, हेही मुंबईकरांना कळायला हवे. नाही का? पूल पाडण्याआधी आम्हीच जनतेचे कैवारी असे दाखवणारे लोकप्रतिनिधी आता कुठे बरे ‘गायब’ झाले? पावसाळी पिकनिकला तर गेले नाहीत ना!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

  1. अगदी बरोबर! निगरगट्ट राजकारणी! आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दाखवायला जागे होतील.

Comments are closed.

Continue reading

मराठी पाऊल.. किती काळ गाणार ही रुदाली?

या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन व बोधगया यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे-मागे' या नेहमीच्याच विषयावर चर्चा ठेवली हॊती. कादंबरी प्रकाशित...

‘राडा’ संस्कृतीवरचा मुख्यमंत्र्यांचा उतारा होईल का पुरेसा?

कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे 'कान' टोचावेच लागले. 'जनता म्हणते की, आमदार माजले आहेत' हे आपण आपल्या वर्तनावरून जनतेला दाखवून...

पुन्हा छत्रपतींचा एक नवा पुतळा प्रस्तावित!

दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व...
Skip to content