Homeचिट चॅटकुर्ल्यात शालेय मुलांचे...

कुर्ल्यात शालेय मुलांचे कबड्डी शिबिर संपन्न

गोरखनाथ महिला संघ, हनुमान क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने ज्ये‌ष्ठ राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच प्रशिक्षक बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील गांधी मैदानात शालेय मुलांसाठी पाच दिवसांचे मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले. 50पेक्षा जास्त शालेय मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला. सायंकाळच्या सत्रात अडीच तास या मुलांना कबड्डी खेळाचे धडे देण्यात आले. या प्रशिक्षणवर्गात कबड्डी सराव कसा करावा, कबड्डी खेळाचे कौशल्य कसे वाढवावे, ते वाढवण्यासाठी कोणते व्यायामप्रकार करावेत याचे मार्गदर्शन रोहित मोरे, वेदांत महाडिक, ओंकार वेताळ यांनी केले.

निवेदक प्रतीक गाढवे यांनी मुलांना या खेळातील विविध कौशल्य प्रात्यक्षिकांसह दाखवून दिली. कबड्डीतील नियमांची माहिती गौरी महाडिक, प्रतीक्षा गाडगे या मुंबई उपनगरच्या पंचांनी करून दिली. या शिबिरात राष्ट्रीय खेळाडू सचिन आयरे, एअर इंडियाचे खेळाडू नितीन घाग, बी.पी.सी.ए.चे सदस्य दीपक कांदळगावकर, सन्मित्र क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू सोहम पुंदे, राष्ट्रीय पंच महादेव घाणेकर यांनी भेट देऊन खेळाडूंना मार्गदर्शन केले. सदर शिबिर आयोजन करण्यासाठी गौरीशंकर क्रीडा मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व शिबिरार्थींना पदके दिली. त्यांच्या शाळांनादेखील गौरवचिन्ह भेट देण्यात आली. दररोज खेळाडूंना खाऊचे वाटप करण्यात आले. यंदा प्रथमच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भावी काळात असेच नियमित शिबिराचे व त्याबरोबरच या मुलांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये स्पर्धा घेण्याचा आयोजकांचा मानस आहे, असे क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांनी सांगितले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content