Homeन्यूज अँड व्ह्यूजसावधान! माणसाची बुद्धिमत्ता...

सावधान! माणसाची बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर घटतेय!!

लगेच स्वत:वर लादून घेण्याची गरज नाही. परंतु असे मानले जात आहे की, माणसे आजकाल पूर्वीइतकी ‘स्मार्ट’ राहिलेली नाहीत. त्यांची बुद्धिमत्ता कमी झाली आहे. हे निरीक्षण
जगप्रसिद्ध अशा फायनान्शियल टाईम्स या माध्यमाने प्रसारित केले आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, विविध वयोगटांचा विचार केला असता माणसांना आज एकाग्रता करणे कठीण जात आहे आणि आज लोक तर्कशुद्ध असा विचार करू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर प्रश्न सोडवण्याचे आणि माहितीवर प्रक्रिया करण्याचे त्यांचे कौशल्यदेखील आज कमी झालेले दिसत आहे. या सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता असे म्हणता येईल. अहवाल पुढे म्हणतो की, यासाठीची जी मानके ठरवली गेली आहेत तीदेखील आज योग्य नाहीत असे दिसते. ती आता कमी करण्याची गरज निर्माण होईल.

बुद्धिमत्तेची मानके ठरवण्याच्या दृष्टीने ज्या चाचण्या घेतल्या गेल्या त्यामधून किशोरवयीन आणि तरुण यांच्याबाबतीत आकलन कौशल्याच्या संदर्भात चाचणी केली गेली. बुद्धिमत्ता आणि आकलनकौशल्य कोरोना महामारीच्या काळापासून वेगाने कमी होणे सुरु झाले असले तरी त्याची सुरुवात मात्र २०१० दशकाच्या मध्यावर झाली आहे असे दिसले. यावरून असा निर्वाळा दिला गेला की कोरोना काळात शिक्षणाच्या क्षेत्रात व्यत्यय आल्यामुळे ही कमी दिसली असली तरी ती अधिक खोलवर रुजलेली आणि महामारीपेक्षा अधिक काळ कायम राहणारी ठरली.

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या ‘भविष्यावर देखरेख’ या कार्यक्रमात अमेरिकेतील १८ वर्षे वयाच्या आणि जागतिक पातळीवर १५ वर्षे वयातील लोकांची चाचणी घेतली गेली. त्यात असे दिसले की, तरुणाईतील हा वयोगट कमी झालेला लक्ष देण्याचा आवाका आणि विचार करण्याचे कौशल्य या दोन्ही गोष्टी परत कशा मिळवता आणि वाढवता येतील यासाठी धडपडतो आहे.
आकलनकौशल्य परत मिळवण्यासाठी चाललेली तरुणाईची धडपड थांबावी असे आपल्याला वाटत असले तरी या प्रश्नाचे उत्तर एक असू शकत नाही. मात्र याची एक कल्पना आणि एक निर्देशांक आपल्याला दिसू शकतो. तज्ञांच्या मते सर्वसाधारणपणे वाचन कमी झाले आहे, यावरून आपल्यालाही कल्पना येऊ शकते.

ही गोष्ट तर भारतातदेखील बघता येईल. पूर्वी वृत्तपत्रातील लेख किमान ८०० ते एक हजार शब्दांचे असत. अग्रलेखही मोठे असत. आज वाचकांची अपेक्षा कमी शब्दात अधिक माहिती मिळाली तर त्यांना ती हवी आहे. मोठ्या आणि शब्दबम्बाळ लेखांवारे केवळ नजर टाकून वाचक पुढे जातो. २०२२मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण केले गेले. त्यात आपण गेल्या वर्षात केवळ एक कथा किंवा एक पुस्तक वाचले असे ३७.६ टक्के अमेरिकन नागरिकांनी स्पष्ट केले. ही आकडेवारी २०१२मध्ये ४५.२ टक्के होती तर २०१७मध्ये कमी होऊन ती ४१.५ टक्के झाली.
असे असले तरी बुद्धिमत्ता कमी होण्याचे हे एकच कारण असू शकत नाही. कारण, वाचन कमी झाले असले तरी ‘ऑनलाईन’ मिळत असलेली प्रचंड प्रमाणातील माहिती मात्र बघितली जाते. मात्र एकूणच एकाग्रता कमी झाल्यामुळे त्यामधील अनेक गोष्टी नजरेतून सुटतात. याच्याचबरोबरीने आणखी एक प्रकार लक्षात घेण्यासारखा आहे. तो असा की एकूणच प्रौढ लोकांची अंक-साक्षरतादेखील कमी झाली आहे. डिजिटल आणि मोबाईल यांचा हा प्रभाव बुद्धिमत्तेवर विपरीत परिणाम करणारा आहे. अनेक देशांमध्ये ही अंक-साक्षरता अत्यंत कमी असल्याचे दिसले.
मोबाईलच्या पडद्यावरील वेळ मुलांच्या मौखिक संभाषणात बाधा आणू शकतो आणि महाविद्यालयातील विद्यार्थी एकाग्रता करू शकत नाहीत अशी दोन महत्त्वाची निरीक्षणे आहेत. यावरून संपूर्ण मानवजातीची बुद्धिमत्ता कमी होते आहे असेही समजण्याचे कारण नाही. परंतु असे होऊ शकते आणि त्याची योग्य ती दखल घ्यावी आणि घसरगुंडी थांबवावी इतकेच…

Continue reading

लक्षात घ्या.. पाण्याचा जीव गुदमरतोय!

आधुनिक विज्ञान असे सांगते की, ताजे पाणी तसेच प्राणवायू यांचे एक जागतिक जलचक्र असते. जलचक्र अनेकांना नद्या, पाण्याचे प्रवाह, सरोवरे आणि तलाव ही केवळ सृष्टीची सुंदरता दाखवणारे भाग नसून ते पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे मान्य केले गेले...

हालचाल अधिक तर मेंदू तल्लख…

आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आपण घेत असलेला श्वासोच्छवास आणि शरीराची हालचाल यावर अवलंबून असते हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यासाठी दररोज किती चालावे, किती काळ व्यायाम करावा, किती काळ झोप घेणे आवश्यक आहे इत्यादी गोष्टीही आता बहुतेक सर्वांना परिचित आहेत....

शर्ट किंवा पँटच्या खिशात ठेवू नका मोबाईल!

एकीकडे मोबाईल फोनने क्रांती करायला सुरुवात केली आणि शहरात तर उंच इमारतींवर मोबाईल संवाद चांगला पोहोचावा यासाठी आवश्यक असे मोबाईल टॉवर दिसायला सुरुवात झाली. मोबाईल आले तेव्हाच लोकांच्या मनात त्यामुळे होणारे उत्सर्जन आणि त्याचे दुष्परिणाम यावर चर्चा घडू लागल्या...
Skip to content