Homeटॉप स्टोरीअयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे...

अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे निधन

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकवरील उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकव्यतिरिक्त, ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबसारख्या गंभीर आजारांशी झुंजत होते.

आचार्य सत्येंद्र दास यांना 2 फेब्रुवारीला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर सुरुवातीला त्यांना अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर त्यांना प्रगत वैद्यकीय सेवेसाठी लखनौ येथील एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. त्यांना गंभीर अवस्थेत 3 फेब्रुवारीला न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 फेब्रुवारीला आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एसजीपीजीआयएमएसला भेट दिली होती.

6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हाही दास मुख्य पुजारी होते. मशीद पडण्यापूर्वी त्यांनी मूर्ती जवळच्या फकीरे मंदिरात हलवल्या होत्या आणि मशीद पडल्यानंतर त्यांनी रामजन्मभूमी येथील तात्पुरत्या मंदिरात मूर्ती ठेवल्या होत्या. अयोध्येतील नवीन श्री राम मंदिराच्या अभिषेक समारंभापासून सत्येंद्र दास त्याचे मुख्य पुजारी म्हणून काम करत होते. आचार्य सत्येंद्र दास यांनी नुकताच 11 जानेवारीला अयोध्येच्या नव्याने उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापनदिन साजरा केला होता. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आणि आपले जीवन धार्मिक सेवेसाठी समर्पित केले. आचार्य सत्येंद्र दास यांनी 2024च्या “द बॅटल ऑफ अयोध्या” या माहितीपट मालिकेतही काम केले होते.

Continue reading

१९ सप्टेेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘कुर्ला टू वेंगुर्ला’!

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट 'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले...

वस्ताद वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरु पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये...

मुंबईत अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उद्यापासून

मुंबई महानगरातील नागरिकांना आरोग्याशी संबंधित सुलभ सेवा देण्यासाठी मुंबई महापालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. पालिकेकडून लवकरच भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘’स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ऍप्लिकेशन)’’ सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका संचालित स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी...
Skip to content