Homeबॅक पेजई. श्रीधरन जॉर्ज...

ई. श्रीधरन जॉर्ज फर्नांडिस पुरस्काराने सन्मानित

रेल्वे मंत्री असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लक्ष दिले होते. अशा मंडळींच्या इच्छाशक्तीमुळेच हा प्रकल्प ७ वर्षांच्या आश्चर्यकारक कालावधीत पूर्ण झाला. जॉर्ज फर्नांडिस आक्रमक कामगार नेते होते, परंतु व्यक्तिगत आयुष्यात त्यांची साधी राहणी होती. त्यांना अनेक भाषा येत आणि नवनवीन संकल्पना ते राबवत. त्यामुळेच त्यांच्या नावे मिळणारा पुरस्कार हा खरोखरच आनंदाचा क्षण असल्याच्या भावना `मेट्रो मॅन ऑफ इंडिया’, पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केल्या.

भारताचे माजी रेल्वे आणि संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस स्मृती राष्ट्रीय पुरस्कार यंदा डॉ. श्रीधरन यांना बंटर भवन, कुर्ला येथे झालेल्या शानदार सोहळ्यात जयश्रीकृष्ण परिसर प्रेमी समितीच्या वतीने प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक टी. जयाकृष्ण शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित या सन्मान सोहळ्यात खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, माजी खासदार गोपाळ शेट्टी तसेच देशभरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीधरन यांनी राबविलेले कोकण रेल्वे, दिल्ली, कोची, लखनौ, जयपूर, विजयवाडा, कोईमतूर आदी ठिकाणची मेट्रो निर्मिती ही आज काळाची गरज होती. त्यावेळी घेतलेले निर्णय धाडसी आणि अचूक असल्यामुळेच आज आपला देश गतिमान झाला आहे आणि अर्थव्यवस्था बळकट करत आहे. राष्ट्राच्या विकसनशील प्रक्रियेतील श्रीधरन यांचे योगदान सदैव प्रेरणादायी आहे, असे विचार टी. जयाकृष्ण शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाला जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

श्रीधरन यांच्या काळात मुलभूत सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी आव्हानात्मक कार्य होते, तरीही त्यांनी चिकाटीने अनेक प्रकल्प राबवले. कोकण रेल्वेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान कायम राहणार आहे. भारतात खडतर अशा कोकण रेल्वे आणि विविध शहरांच्या मेट्रो रेल्वेच्या निर्मितीच्या योगदानाबद्दल त्यांना `भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, अशी भावना गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली. मेट्रो मॅन ऑफ इंडिया’ पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केल्या.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content