Homeकल्चर +जयपूर महोत्सवात मिळाला...

जयपूर महोत्सवात मिळाला ‘दाल रोटी’ला पुरस्कार

१६व्या जयपूऱ चित्रपट महोत्सवात ‘दाल रोटी’ चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चित्रपटाच्या दिग्दर्शिका ज्युली जास्मिन यांनी राजस्थानचे माजी मुख्य सचिव निरंजन आर्य, बी. एस. रावत, होनू रोज आदी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरपासून देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची इफ्फी २०२४च्या महोत्सवासाठीदेखील निवड झाली आहे. प्रसिद्ध निर्माते सलीम या चित्रपटाचे निर्माते असून ज्युली जास्मिन दिग्दर्शिका आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करून त्यांची सोडवणूक करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट देशातील शेतकरी आणि जनतेसाठी शेती तसेच देशभक्तीचा संदेश देणारा आहे.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content