Homeबॅक पेजराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत पुण्याच्या पुरुष संघाला‌ विजेतेपद

मुंबईतल्या सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे सुरू असलेल्या ५८व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक गटाचे विजेतेपद पुण्याने पटकाविले.

पुण्याच्या अनिल मुंढे याने मुंबईच्या महम्मद घुफ्रानवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे चुरशीच्या लढतीत तीन सेटनंतर पुण्याच्या रहिम खानने मुंबईच्या विकास धरियावर विजय नोंदविला. पुण्याच्या योगेश परदेशी आणि सागर वाघमारे या दुहेरीच्या जोडीने मुंबईच्या संदीप देवरुखकर व फहिम काझी जोडीवर चुरशीचा विजय मिळवत पुण्याला ३-० असे विजेतेपद मिळवून दिले.

पुरुष सांघिक गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी  झालेल्या लढतीत मुंबई उपनगरचा संघ वरचढ ठरला. त्यांच्या मंगेश पंडितने ठाण्याच्या महम्मद ओवेस अन्सारीला नमविले. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या सज्जाद शेखने ठाण्याच्या समीर अन्सारीला हरविले. दुहेरीच्या लढतीत विश्वनाथ देवरुखकर व विवेक कांबळे जोडीने ठाण्याच्या दीपक गनिका आणि महेश शेट्ये जोडीला नमवून आपल्या संघाला ३-० असा एकतर्फी विजय मिळवून दिला.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content