Homeन्यूज ॲट अ ग्लांसनिवासी डॉक्टरांचा संप...

निवासी डॉक्टरांचा संप मागे!

पश्चिम बंगालमध्ये एका निवासी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याचा निर्णय झाल्यानंतर देशभरातल्या विविध रूग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून सुरू केलेला संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने सार देश हादरला होता. प. बंगालमधल्या एका शासकीय रूग्णालयातल्या महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर प. बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत, असा दावा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपील पकडण्याची मुदत जाहीर केली होती. तसे झाले नाही तर आपण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याकरीता तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी संघटनेने काल संप पुकारला होता. त्यानुसार काल देशभर निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. याच काळात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत नड्डा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी घोषित केली. त्यानंतरनिवासी डॉक्टारांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांना उपचार मिळणार आहेत.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content