Homeडेली पल्सऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना...

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि बॉलीवुड स्टार आयुष्मान खुराना यांनी देशवासीयांना विशेष आवाहन केले आहे- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला गौरव मिळवून देण्यासाठी भारतीय दलाचे

आयुष्मान

उत्साहवर्धन करा! या मोहिमेची सुरूवात म्हणून आयुष्मानला मनसुख मांडविया यांनी भारतीय संघाचा स्मरणार्थ टीशर्टही दिला.

आयुष्मान पुढे लिहितो, “चला त्यांना भारताचा अभिमान वाढवण्यासाठी प्रोत्साहित करूया. चला त्यांना दाखवूया की आमच्या खेळांबद्दलची आमची दृढता, संकल्प आणि आवड किती गहन आहे. आज युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना भेटून भारतीय दलाला प्रोत्साहित करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्याचा मोठा सन्मान आहे. जय हिंद!

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content