Homeएनसर्कलविनायक खेडेकर, सुनयना...

विनायक खेडेकर, सुनयना हजारीलाल ठरले अकादमी फेलो!

संगीत, नृत्य आणि  नाट्य कलेशी संबंधित संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या जनरल कौन्सिलने नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील सहा नामवंतांची अकादमी फेलो (अकादमी रत्न) म्हणून एकमताने निवड केली. विनायक खेडेकर, आर. विश्वेश्वरन, सुनयना हजारीलाल, राजा आणि राधा रेड्डी, दुलाल रॉय आणि डी. पी. सिन्हा अशी या नामवंतांची नावे आहेत.

अकादमीची फेलोशिप हा सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ सन्मान आहे, जो कोणत्याही वेळी जास्तीतजास्त 40 कलाकारांना दिली जातो. जनरल कौन्सिलने संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 आणि 2023 वर्षांसाठी संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक/लोक/आदिवासी संगीत/नृत्य/नाट्य, कठपुतळी आणि एकूणच योगदान/शिष्यवृत्ती या क्षेत्रातील कलाकारांची निवड केली आहे.

अकादमीच्या जनरल कौन्सिलने 2022 आणि 2023 या वर्षांसाठी संगीत नाटक अकादमीच्या ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी’ 80 तरुण कलाकारांचीदेखील निवड केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र आणि शाल तसेच 25,000/- रुपये असे आहे. हे पुरस्कार संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

1952पासून अकादमी पुरस्कार प्रदान केले जात आहेत. अकादमी रत्नच्या सन्मानार्थ ताम्रपत्र आणि शाल याव्यतिरिक्त 3, 00, 000/- रुपये दिले जातात. तर अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1,00,000/- रुपये आहे. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content