Homeएनसर्कलभारताचे सध्या 61...

भारताचे सध्या 61 देशांशी अंतराळ सहकार्य

सध्या 61 देश आणि पाच बहुपक्षीय संस्थांसोबत अंतराळ सहकार्यसंबंधी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, उपग्रह रिमोट सेन्सिंग, उपग्रह दिशादर्शन, उपग्रह संचार, अंतराळ विज्ञान आणि ग्रहांचा शोध आणि क्षमता निर्मिती ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे आहेत.

भारतीय अंतराळ धोरण 2023 प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी क्षेत्राला अंतराळ क्षेत्रात सुरुवातीपासून शेवटपर्यंत विविध उपक्रमांमध्ये अभिनव संशोधन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तसेच इंडिया नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) ही अंतराळ क्षेत्रात खाजगी क्षेत्राच्या सहभागाला चालना, मान्यता  आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक -खिडकी संस्था म्हणून कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्राधान्यक्रम प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय अंतराळ कार्यक्रमाची क्षमता वाढवणे, अंतराळ विज्ञान आणि पृथ्वी निरीक्षण डेटा बेस वाढवणे, ग्राउंड स्टेशन नेटवर्क अधिक व्यापक करणे, संयुक्त प्रयोगांद्वारे  उत्पादने आणि सेवा सुधारणे आणि अनुभवी मनुष्यबळाचा ओघ वाढवण्यासाठी विविध मंच स्थापन करणे  या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) आंतरराष्ट्रीय सहकार्य करत आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content