Homeडेली पल्सराज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये...

राज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी कक्ष!

राज्यातील ड्रग तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीसठाण्यांत अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करून एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. आजवर राज्यात पन्नास हजार कोटी रुपयांहून जास्त किंमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात चेतन तुपे, सुनील कांबळे, रोहित पवार, विश्वजीत कदम यांच्यासह अनेक सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ललित पाटील याला ससून रुग्णालयात इतके दिवस कोणाच्या आशीर्वादाने ठेवण्यात आले, अशी विचारणाही या सदस्यांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, ललित पाटीलला पकडल्यानंतर त्याची साधी पीसी म्हणजे पोलीस कोठडीही घेण्यात आली नव्हती. तेव्हा २ एप्रिल २०२१ला पिंपरीचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ३ पानी पत्र राज्य सरकारला लिहिले. त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून ललित पाटीलची पोलीस कोठडी मिळण्यासाठी परवानगी मागितली होती. पण, ती दिली गेली नाही. ललित पाटील हे उद्धवजींच्या शिनसेनेचे शहरप्रमुख होते. तरीही रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील आरोपीला इतके दिवस ठेवले गेले असेल तर ते चूकच आहे. पण, या विषयावर आम्हाला राजकारण करायचे नाही.

अंमली

ज्यांनी हे दबावाखाली केले त्यांच्यावरही कारवाई करा, ही मागणी अनिल देशमुख यांनी केली. त्यावर कारवाई केली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आजवर पन्नास हजार कोटींवरहून अधिक किंमतीची ड्रग्स पकडण्यात आली आहेत. ललित पाटील प्रकरणात आजवर कोणताही राजकीय सहभाग आढळून आला नाही. याप्रकरणी संबंध असलेल्या चार पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, असं ही फडणवीस यांनी सांगितलं.

ठाण्यात पेमेंट गेटवे फसवणूक प्रकरणात सोळा हजार कोटींचा व्यवहार झाला असल्यामुळे त्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे व्यवहार राष्ट्रीय स्तरावरही असून गरज पडल्यास केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी तीन महिन्यांत तपासाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल असंही फडणवीस म्हणाले. मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. आशिष शेलार, रवींद्र वायकर, तमिळ सेल्वन यांनी उपप्रश्न विचारले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content