Homeडेली पल्सराज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये...

राज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी कक्ष!

राज्यातील ड्रग तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीसठाण्यांत अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करून एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. आजवर राज्यात पन्नास हजार कोटी रुपयांहून जास्त किंमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात चेतन तुपे, सुनील कांबळे, रोहित पवार, विश्वजीत कदम यांच्यासह अनेक सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ललित पाटील याला ससून रुग्णालयात इतके दिवस कोणाच्या आशीर्वादाने ठेवण्यात आले, अशी विचारणाही या सदस्यांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, ललित पाटीलला पकडल्यानंतर त्याची साधी पीसी म्हणजे पोलीस कोठडीही घेण्यात आली नव्हती. तेव्हा २ एप्रिल २०२१ला पिंपरीचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ३ पानी पत्र राज्य सरकारला लिहिले. त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून ललित पाटीलची पोलीस कोठडी मिळण्यासाठी परवानगी मागितली होती. पण, ती दिली गेली नाही. ललित पाटील हे उद्धवजींच्या शिनसेनेचे शहरप्रमुख होते. तरीही रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील आरोपीला इतके दिवस ठेवले गेले असेल तर ते चूकच आहे. पण, या विषयावर आम्हाला राजकारण करायचे नाही.

अंमली

ज्यांनी हे दबावाखाली केले त्यांच्यावरही कारवाई करा, ही मागणी अनिल देशमुख यांनी केली. त्यावर कारवाई केली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आजवर पन्नास हजार कोटींवरहून अधिक किंमतीची ड्रग्स पकडण्यात आली आहेत. ललित पाटील प्रकरणात आजवर कोणताही राजकीय सहभाग आढळून आला नाही. याप्रकरणी संबंध असलेल्या चार पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, असं ही फडणवीस यांनी सांगितलं.

ठाण्यात पेमेंट गेटवे फसवणूक प्रकरणात सोळा हजार कोटींचा व्यवहार झाला असल्यामुळे त्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे व्यवहार राष्ट्रीय स्तरावरही असून गरज पडल्यास केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी तीन महिन्यांत तपासाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल असंही फडणवीस म्हणाले. मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. आशिष शेलार, रवींद्र वायकर, तमिळ सेल्वन यांनी उपप्रश्न विचारले.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content