Homeब्लॅक अँड व्हाईटज्येष्ठ कलाकारांना मिळते...

ज्येष्ठ कलाकारांना मिळते दरमहा 6000 रूपयांचे अर्थसहाय्य

ललित कला आणि संस्कृतीच्या प्राविण्यप्राप्त क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या परंतु वृद्धत्वामुळे आता आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ कलाकारांसाठी सांस्कृतिक मंत्रालय “ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना” या नावाने एक योजना राबवते. या योजनेचा नुकताच आढावा घेण्यात आला आणि जून 2022पासून मासिक आर्थिक सहाय्य रु. 4000/-वरून रु. 6000/- करण्यात आले आहे, अशी माहिती ईशान्य प्रदेशाचे सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काल लोकसभेत दिली.

सध्याच्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित लाभार्थी कोणत्याही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित असला तरीही निवडलेल्या कलाकारांना रुपये 6000/- प्रति महिना आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 11233 कलाकारांची निवड करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

केरळ राज्यासह सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील निवडक लाभार्थ्यांना त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यावर त्यांना आर्थिक सहाय्य वेळेवर वितरित व्हावे यासाठी सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. योजनेंतर्गत आर्थिक सहाय्याचे वितरण मात्र लाभार्थींनी काही अनिवार्य कागदपत्रे सादर करण्यावर अवलंबून असते. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर, आर्थिक सहाय्य त्वरित वितरित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदतीचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय आणि कॅनरा बँक यांच्यात 28.06.2023 रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content