Homeन्यूज अँड व्ह्यूजशिजवलेल्या अन्नाच्या दरात...

शिजवलेल्या अन्नाच्या दरात गेल्या 5 वर्षांत 71 टक्क्यांनी वाढ

राज्यातील प्रत्येक घरात शिजवण्यात येणाऱ्या अन्नाची दरवाढ गेल्या पाच वर्षांत सुमारे 71 टक्क्यांनी वाढ झालेली असून त्याच्या तुलनेत पगारात मात्र केवळ केवळ 37 टक्के इतकी कमी वाढ झाल्याने सर्वसामामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

या शिजवलेल्या अन्नात केवळ दोन वेळचे जेवण धरलेले आहे. सकाळचा चहानाश्ता, दुपारचा चहाबिस्किटे व संध्याकाळचा चहापाणी यांचा अंतर्भाव नाही. त्याचा खर्च समाविष्ट केल्यास ही टक्केवारी

80 टक्क्यांच्या घरात नक्कीच जाईल. सध्याचे सरकार आणि लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या मूळ मुद्द्याकडे लक्ष देऊन काही करण्याचे आश्वासन देण्याची खरेतर कधी नव्हे इतकी गरज आहे. राजकीय जुमलेबाजी काय केव्हाही केली जाऊ शकते.

यात बेरीजगारीचा उल्लेख नाही, नवीन घरे केवळ कागदावरच आहेत व त्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे केव्हाच पार केलेली आहेत. त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे गेल्या 20/25 वर्षांत अनेक कारखाने, गिरण्या बंद पडलेल्या आहेत. तेथे नवीन उद्योग आलेले आहेत. मात्र तेथील हजारो जुन्या कामगारांना कोट्यवधी रुपयांची थकीत देणी अद्यापी मिळालेली नाहीत. काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. परंतु तब्बल 20 वर्षांनीही न्यायाल्यालाही काही ‘पाझर’ फुटलेला नाही. तरीही सर्व न्यायाधीश व राजकीय नेते मात्र जोरशोरशे सांगत असतात “न्यायालयालाही मानवी चेहरा” असावा! हा चेहरा कुठे बरे मिळेल?

(आकडेवारी संदर्भ दि हिंदू यांच्या सौजन्याने)

Continue reading

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...

अंबरीश मित्रा, दुर्गाबाईंच्या नावाने ‘हुंदका’ काढलास म्हणून….

अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा...
Skip to content