Sunday, March 16, 2025
Homeडेली पल्स5000 पट्ट्यांचे होणार...

5000 पट्ट्यांचे होणार लवकरच वाटप..

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशातील सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी परिवारातील सुपुत्री विराजमान झाली. यामुळे आदिवासी समाजाचा बहुमान वाढला. मोदींच्या कार्यकाळात आदिवासी समाजातील बंधू-भगिनींना आपल्या हक्काचे जमिनींचे पट्टे मिळाले. येत्या काळात उर्वरित 5000 पट्ट्यांचे वाटप होईल, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

नंदुरबार लोकसभेच्या भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ शिरपूर, धुळे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आ. अमरिश पटेल यांच्या प्रयत्नांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शिरपूरमध्ये पाण्याचे नियोजन झाले व शिरपूर पॅटर्न तयार झाला. संपूर्ण महाराष्ट्राने हा पॅटर्न स्वीकारला आणि यामुळे शेतीमध्ये पाणी पोहोचून अनेक भाग दुष्काळमुक्त झाले. शिरपूर शिक्षणाचे हब झाल्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळाले. आदिवासी समाजातील युवक-युवतींना उच्चशिक्षण मिळावे यासाठी अमरिशभाई यांनी मोलाचे कार्य केले, असेही ते म्हणाले.

या भागात अनेर धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून मिळणे, अरुणावती नदीवर 5 बंधारे बांधणे आणि शिरपूरमध्ये एमआयडीसी सुरु करणे अशा सर्व विकासकामांबद्दल राज्य सरकारद्वारे प्रयत्न केले जातील. मजबूत भारताच्या निर्मितीसाठी नंदुरबारची जनता मोदींच्याच मागे उभी राहील. डॉ. हिना गावित यांचे लोकसभा सदस्य म्हणून केलेले काम लक्षात घेण्यासारखे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी आ. अमरिश पटेल, आ. राजेश पाडवी, आ. काशिराम पावरा, आ. आमश्या पाडवी, आ. मंजुळा गावित, विजया रहाटकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content