Homeपब्लिक फिगरउत्तर मुंबईतून महायुतीचे...

उत्तर मुंबईतून महायुतीचे ४० नगरसेवक महापालिकेवर!

आम्ही ‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. उत्तर मुंबईमध्ये आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रदूषण, पायाभूत सुविधा इत्यादी समस्या कशा पद्धतीने सोडविल्या जातील यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आता महापालिकेच्या निवडणुका सुरू होतील. त्यावेळी महायुतीचे ४० नगरसेवक जिंकून येतील, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तसेच उत्तर मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे खासदार पियूष गोयल यांनी काल एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनवण्यासाठी पियूष गोयल गेली सात महिने प्रयत्नशील आहेत. उत्तर मुंबईत विकासकामांचा झपाट्याने विस्तार होत असून अनेक नवीन योजना राबवल्या जात आहेत. लाखो नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. उत्तर मुंबईतील विकासात्मक प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांनी शनिवारी महापालिका, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, क्रीडा अधिकारी आणि जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनासह विविध संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नागरी सेवासुविधाविषयी महापालिकेच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत ६० हजार कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांची चर्चा झाली. सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प आणि नव्याने सुरू होणारे प्रकल्प तातडीने सुरू करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

‘उत्तर मुंबईला उत्तम मुंबई’ बनविण्यासाठी कोस्टल रोड, लोखंडवाला डीपी रोड, मालाड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, डेव्हलपमेंट प्लेग्राऊंड, स्वच्छता मोहीम, पर्यटनस्थळांची ओळख आणि विकासासाठी नियोजन, १०० स्वयंसहायता गटांना प्रशिक्षण देण्यासाठी उपक्रम, कोळी समाजासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन, सांस्कृतिक केंद्र उभारणी, बोरीवली (पूर्व) येथे पार्किंग जागेची उपलब्धता निर्माण करणे, आरोग्यसेवा सुधारण्यासाठी उपाययोजना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बुद्ध पुतळ्याबाबत अभ्यासिका योजना, पोईसर नदीचे रुंदीकरण, पुनर्वसन, इत्यादी विषयांवर यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

उत्तर मुंबईतील विकासयोजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभिकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध समस्यांचा समावेश आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यात, मालाड बसस्थानक बांधणे, गोराई व चारकोप येथील पाण्याची समस्या, मालाड (पू) येथे इनडोअर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, चारकोपमध्ये नाट्यगृह व समाजमंदिर उभारणे, मालवणी येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महाकाली रोड ते शहीद अब्दुल हमीद रोडचे काम, कांदिवली (प) येथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन व परशुराम थीम पार्क इत्यादी विषयांवरही प्रकाश टाकण्यात आला. एसआरए प्रकल्पाअंतर्गत चारकोप व बोरीवली येथील पुनर्वसनाचा मुद्दा आणि कांदिवलीमध्ये १५ हजार रहिवाशांना सांडपाण्याचा प्रश्न याविषयी सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी, आमदार अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, नगरसेवक गणेश खणकर आदी लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

भगवती रुग्णालय मे महिन्यात रुग्णांच्या सेवेत

भगवती, शताब्दी व सावित्रीबाई या रुग्णालयातील अपुरी साधनसामुग्री व मनुष्यबळ वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच भगवती रुग्णालय मे महिन्यापर्यंत रुग्णांच्या सेवेत दाखल होईल. प्रत्येक रुग्णालयात आयुष्यमान योजनेतून रुग्णांना सेवा पुरवली जाईल, असेही केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले.

या बैठकीची काही ठळक वैशिष्ट्यं-

60,000 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांवर चर्चा.

पाच महिन्यांत ही तिसरी बैठक.

कोळी समुदायासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांचे नियोजन.

उत्तर मुंबईत 15 ऑगस्टपर्यंत एक आधुनिक, मल्टीस्पेशलिटी रुग्णालय.

भगवती आणि शताब्दी रुग्णालयांचा पुनर्विकास आणि 1,000 बेड्स असलेले सुपर स्पेशलिटी रुग्णालय.

वाहतूककोंडी, वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कोस्टल रोड, मढ-वर्सोवा पूल बांधकाम, नवीन पाणी पाईपलाइन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणांवर लक्ष ठेवणे आणि ‘एक पेड माँ के नाम’ अभियान, लखपती दिदीमार्फत महिलांना लाभ, मच्छीमारांना मासेमारीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोय आणि कार्यशाळेचे आयोजन इत्यादी.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content